मोहोळ -दि. १० रोजी पुणे -सोलापूर महामार्गांवर अवैध् पद्धतीने गो -तस्करी होत असलेली माहिती तेथील गोसेवा करणाऱ्या काही गोरक्षक यांना लागली व नेमकी दुपारी 2.30 ते 3.00 च्या सुमारास त्यांना तशी तीन देशी गाई व दोन बैल अश्या एकाच पिक -अप गाडीत दाटीवाटीने जागा नसताना एवढी जनांवरे जखमी अवस्था मध्ये पहिली.
त्यानंतर त्यांनी मोहोळ अधिकार क्षेत्रातील पोलीस अधीक्षक श्री. शेंडगे यांना सदर गोसेवा करणाऱ्या संग्राम फाटे-पाटील यांनी अशी अशी गाडी बेकारदेशीर पण जनावरे घेऊन जात असलेबद्दल माहिती दिली परंतु सदर गोसेवकांचा फोन ऐकताच शेंडगे साहेब यांची तळपायाची आग मस्तकात गेली व त्या गोसेवकला अरेतुरे करत तुला कोणी अधिकार दिला गाडी अडवायचा ते काम आमचं आहे आमचं आम्ही बघू.. तसेच तुझं काम फोन करायच आहे. तो येऊ दे तुझ्यावरच गुन्हा दाखल करतो.. वगैरे असं घाणेरड्या शब्दात सुनावलं..
त्यानंतर सदर अधिकारी यांनी तिथे जाऊन ती पिक-अप गाडी कोणतीही विचार पूस न करता तिथून मार्गस्त करून दिली. सदर घटनेबाबत गोरक्षक यांना विचारणा केळी असता सदर पोलीस अधीक्षक हे मोठ्या प्रमाणात हप्ता वसूल करतात,सीना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू चोरी होते, खंडाळा पार्टी येथे अवैध गॅस चोरी होते तसेच मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यातून गुटखा मोहोळ मध्ये आणला जातो या सर्वाना सदर अधिकारी हे काही रकमेचे हप्ते घेऊन त्यांना सहकार्य करत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
सदर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक हे कसाई यांच्या कडून मोठ्या प्रमाणात हप्ता घेत असल्या मुळे ते सदर गोरक्षक यांना कायद्याच्या चौकट मध्ये अडकून कसाई लोकांना मदत करत असल्याचे त्या विभागातील सर्व गोरक्षक दलाच्या सदस्यानी आरोप केला आहे.
वरील सर्व प्रकरणात सदर अधिकारी हे गोसेवा करणाऱ्या तरुणाला तुला काय अधिकार आहे गाडी अडवायचा अशी विचारणा करत असल्याच दिसून येतेय परंतु यावेळी ते आपल्या राज्य घटनेत जर आपल्या डोळ्या समोर एखांदी अप – प्रवृत्ती, बेकायदेशीर घटना घडतं असेल तर त्याला सामान्य नागरिक सुद्धा विरोध करू शकतो असा अधिकार असताना देखील सदर अधिकारी यांनी त्या गोसेवा करनारया तरुणाला त्याच्या अधिकारा पासून परावृत्त करून उलट त्यालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कुठंतरी पाणी नक्की मुरतेय अशी शंका घ्याला वाव दिला आहे.
आता सदर घटनेबाबत विविध स्तरातून सदर अधिकारी यांची भ्रष्टाचार, हप्ते वसुली या बद्दल वरिष्ठ पातळी वरून चौकशी करण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे.सदर अधिकारी यांच्या बाबत वरिष्ठ अधिकारी व सरकार यांनी जर याबाबत योग्य ती भूमिका घेतली नाही तर भविष्यात हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चिघळन्याची शक्यता आहे कारण राज्यातील विविध गोरक्षक संघटना यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
आता याकडे राज्याचे हिंदुत्व वादी असणारे सरकार, गाईला राज्य मातेचा दर्जा देणारे सरकार, गो-हत्या बंदी कायदा आणणारे सरकार, गोरक्षक यांना कायदेशीर अभय देणारे सरकार आता अश्या प्रकारे वर्तन करणाऱ्या अधिकारी यांचे वर कोणत्या प्रकारे कारवाई करणार हे या विरोधात होणाऱ्या तीव्र आक्षेप, आंदोलन यानंतर ठरणार की अगोदर हे सांगणे सध्यातरी कठीण आहे.
प्रतिनिधी (राजू जाधव)
📞७६६६७०२४०१
Youtube@Reporter_Rajs
Instagram@reporter_rajs
Facebook@reporter.rajsjadhav007


