
पेरणोली गणाच्या सर्वांगीण विकासासाठी जयवंत मसणू सुतार यांचा ‘विकासाचा संकल्प’; ग्रामीण चेहरा बदलण्यावर दिला भर
आजरा: (प्रतिनिधी)
ग्रामीण भागाचा विकास हाच देशाच्या प्रगतीचा पाया आहे, ही संकल्पना उराशी बाळगून पेरणोली जिल्हा परिषद गणातून जयवंत मसणू सुतार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. “जिल्हा परिषद सदस्याची भूमिका केवळ प्रतिनिधी म्हणून नाही, तर गावाच्या प्रगतीचा कणा म्हणून असते,” असे मत मांडत त्यांनी आपल्या विकासकामांचा कृती आराखडा मतदारांसमोर ठेवला आहे.
ग्रामीण पायाभूत सुविधांना प्राधान्य
जयवंत सुतार यांनी आपल्या निवडणूक अजेंड्यामध्ये गावांमधील मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने:
स्मशानभूमी सुशोभीकरण: गावागावांत अंत्यसंस्कारासाठी सुसज्ज निवारा शेड उभारणे.
प्रशासकीय बळकटीकरण: ग्रामपंचायत कार्यालयांच्या नवीन इमारतींचे बांधकाम आणि जुन्या इमारतींची दुरुस्ती करणे.
स्वच्छता आणि आरोग्य: सांडपाण्याच्या नियोजनासाठी आधुनिक बंदिस्त पाईपलाईन आणि गटार व्यवस्था कार्यान्वित करणे.
शिक्षण: जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे.
शेतकरी आणि नागरिकांच्या हिताचे रक्षण
केवळ रस्ते आणि गटारीच नव्हे, तर सामाजिक आणि कृषी विकासासाठीही सुतार यांनी ठोस भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक अवजारे मिळवून देणे, गावांत ‘समाज मंदिर’ निधी उपलब्ध करून देणे, तसेच सुरक्षिततेसाठी मुख्य रस्त्यांवर सोलर लाईट बसवणे यांसारख्या कामांना त्यांनी प्राधान्य दिले आहे.
सहकाऱ्यांसह विकासाची नवी फळी
या निवडणुकीत जयवंत मसणू सुतार यांच्यासोबत पंचायत समितीचे उमेदवार श्री. समीर पारदे आणि सौ.स्मिता देसाईहे त्यांचे सहकारी देखील खांद्याला खांदा लावून लढत आहेत. पेरणोली मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रामाणिकपणे लोकसेवा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या उमेदवारांनी आपले अमूल्य मत देऊन विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
“गावचा विकास हीच आमची ओळख” या ब्रीदवाक्यासह जयवंत सुतार यांनी प्रत्यक्ष भेटीगाठींवर जोर दिला असून, पेरणोली गणात त्यांना मोठा जनपाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

