Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

भारताचे राष्ट्रनिर्माते . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Gopal Gadkari by Gopal Gadkari
April 16, 2025
in SANGLI MAHARASHTRA
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

भारताचे राष्ट्रनिर्माते . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१४ एप्रिल विश्वरत्न युगपुरुष, प्रज्ञासुर्य,महामानव, भारतरत्न डॉ.  भिमराव रामजी आंबेडकर यांची १३४ वी जयंती संपूर्ण जगभरात तब्बल १५० देशामध्ये उत्साहात साजरी होत आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली मध्यप्रदेश ' महू ' या गावी एका अस्पृश्य कुळात झाला ज्यांचे स्थान गावकुसाबाहेर होते. पण आपल्या कर्तृत्वाने त्यांनी इतकी उंची गाठली की गावकुसा बाहेरचे काम पण देशाबाहेरचे विद्वान ही नतमस्तक झाले.

संत कबीर आपल्या एका दोह्यामध्ये म्हणतात
” जाती न पूछो साधू की, पूछ लिजिएज्ञान. मोल करो तलवारका पड़ा रहन दोम्यान “
म्हणजे – माणसाची श्रेष्ठता त्याने कोणत्या जातीत जन्म घेतला यावर अवलंबून नसून सर्वस्वी त्यांच्या ज्ञान आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. असे सांगणाऱ्या संत कबीराच्या दोह्या प्रमाणे ज्यांचे जीवन होते ते म्हणजे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.
बाबासाहेब म्हणजे काय?
हे सांगताना ‘ आचार्य अत्रे म्हणतात, बाबासाहेब म्हणजे बंड – मूतिमंत बंड, ज्यांच्या देहाच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते. बाबासाहेब म्हणजे कर्मकांडाच्या, जातीयव्यवस्था विरुध्द पुकारलेला एक बुलंद आवाज होय.
अॅन्टोनिया ग्रॅमसी नावाच्या विचारवंताने बाबासाहेबांचे वर्णन ‘ जैविक बुध्दिवंत ‘ म्हणून केले आहे. असा जैविक बुद्धिवंत जो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न्याय पद्धतीने राष्ट्रासमोर मांडतो आणि संपूर्ण देशाच्या प्रगतिसाठी झटतो आणि म्हणूनच भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर हे २० व्या शतकातील सर्वश्रेष्ठ बुद्धिवंत होते. भारताच्या राजकारणात, समाजकारण, अर्थकारण तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे देशाला असणारे योगदान अचंबीत करणारे आहे. म्हणूनय ख्यातनाम इतिहासतज्ञ,रामचंद्र गुहा आपल्या ‘ मॉडेल्स स्मेकर्स ऑफ इंडिया ‘ या ग्रंथात बाबासाहेबांचा उल्लेख ‘ आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते ‘ असा करतात.
बाबासाहेब हे एक महान समाजसुधारक, राजकिय विचारवंत होते, आर्थिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या कार्यामुळे आणि विचारामुळे भारतीय समाजाची प्रगती झाली आहे. बाबासाहेब एक जलतज्ञ होते देशातील पाण्याचे संकट दूर व्हावे म्हणून उत्कृष्ठ जल व्यवस्थापन केले या संदर्भात डॉ. सुखदेव थोरात यांनी लिहीलेल्या ‘ आंबेडकर रोल्स इन इकॉनॉमिक्स प्लानिंग अँड वॉटर पॉलीसी ‘ या इंग्रजी ग्रंथात ते म्हणतात – ‘ भारताच्या पहिल्या मुख्य धरणाची पायाभरणी बाबासाहेबांनी केली ‘ हिराकुड, दामोदर, सोन नद्यावरील ‘ नदीखोरे प्रकल्प ‘ मंत्री पदावर असताना प्रश्न मार्गी लावले.
शेती तज्ञ आणि शेतकऱ्यांचा नेते होते शेती विषयक मुल्य सारणीचे स्वतंत्र असे चिंतन केले शेती ही शास्त्रशुद्ध आणि आधुनिक पद्धतीने केली जावी यासाठी शेतकर्यांना प्रशिक्षण दिले जावे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा शेती सिंचन सुविधा निर्माण करणे शेतीला पुरक उद्योगाची जोड देणे, आस्मानी संकटात मदत करणे शेतकर्यांची आर्थिक कुवत बघुन त्यांच्यावर कर आकारणी करणे.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारने जमीनदारी नष्ट केली मोठ्या प्रमाणावर जमीनीचे वाटप केले. देशामध्ये कुळ कायदा हा बाबासाहेबांमुळे आला त्यांच्या विचारामुळे बी – बियाने, खते, कर्ज, कृषी उत्पादने समित्या यांची सोय झाली. बाबासाहेब हे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ होते. अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या परदेशात डॉक्टरेट पदवी मिळविणारे ते पहिले भारतीय होते.
बाबासाहेब हे थोर शिक्षणतज्ञ होते दलित वर्गासाठी शिक्षण संस्था, पिपल्स् एज्यूकेशन सोसायटी या संस्थेद्वारे देशात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले जावे यासाठी आवाज उठविणारे बाबासाहेब होय.
थोर घटनातज्ञ होते भारतीय राज्य घटना हा देशाचा सर्वाच्य कायदा आहे भारतीय संविधानातून बाबासाहेबांनी देशातील प्रत्येक घटकाला समान अधिकार, हक्क स्वातंत्र्य न्याय मिळवून दिला म्हणूनच घटनेचे शिल्पकार ठरले त्यांच्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा, लिहीण्याया जगण्याचा, व्यवसाय करण्याचा प्रबोधन करण्याचा शिक्षण, संघटीत धर्म चिकित्सा करण्याचे स्वातंत्रय मिळाले.
पूर्वी कामगाराना बारा तास काम करावे लागत होते ते आता फक्त आठ तास काम करावे लागते, बोनस, ग्रॅज्यूएटी, पेन्शन, स्रीयांना मतदानाचा हक्क समान वेतन अधिकार आरक्षण,भर पगारी प्रसुती रजा मिळण्याचा अधिकार राज्य घटनेतून मिळवूनदेण्याचे कार्य बाबासाहेबांनी दिले.
डॉ. बाबासाहेब हे थोर पत्रकार होते. वृत्तपत्राच्या माध्यमातून वंचित व शोषितांचा आवाज बुलंद करणारे थोर संपादक होते. त्यांनी मुकनायक, जनता, समता, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत या मराठी नियतकालिकांचे संपादन केले व देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांवर आपले अनमोल विचार मांडले व समाजपरिवर्तन घडविले.
बाबासाहेब हे एक महान लेखक होते त्यांची ग्रंथ संपदा विपुल प्रमाणात आहे. एकूण 32 ग्रंथ १० शोधनिबंध१0 निवेदने एवढा मोठा ग्रंथसंग्रह त्यांनी इंग्रजी भाषेत लिहीला एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेबां बाबासाहेबांनी केले ते बहुमुखी होते मराठी, संस्कृत पाली, इंग्रजी, फ्रेंच, हिंदी जर्मन, गुजराती, बंगाली, तमीळ, कन्नड, पारशी एवढ्या भाषा जाणनारे थोर विद्वान होते.
डॉ. आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ आंतराष्ट्रीय समता दिन ‘ म्हणून घोषित केला आहे. तसेच २००४ साली कोलंबिया विद्यापीठाने जगातील टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली त्या यादीत पहिले नांव डॉ. भिमराव आंबेडकर यांचे होते.
जगातील सर्वात मोठी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी केली जाते व भारतात सर्वाधिक पुतळे आहेत. सर्वात मोठा पुतळा अमेरीकेतील मॅरीलँड राज्यात आहे स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी या नावाने या पुतळ्याला ओळखले जाते एकूण १३ एकरात स्मृती पार्क उभारण्यात आला आहे. असे हे जगातील एक महान व्यक्तीमहत्व आहे. राष्ट्रहित जपणारा राष्ट्रभक्त विचारवंत, संसदपट्टू प्रभावी वक्ता विविध ग्रंथांचा नित्यवाचक, थोर लेखक पुस्तकासाठी स्वतःच्या घरात ग्रंथालय उभा करणारा ग्रंथप्रेमी जगमान्य विद्वान, अनेक शिक्षण संस्थेचा दुरदृष्ठी संस्थापक, समाजभिमूख पत्रकार, अशा विविध गुणरूपी अलंकारांनी विभूषित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक लोकोत्तर तेजस्वी आणि वंदनीय पुरुषोत्तम होऊन महिले आहेत. म्हणूनच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते आहेत.
शेवटी….
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या मानुसकीची
तुम्ही देव नव्हता,देवदूतही नव्हता नव्हता
तुम्ही मानवतेसाठी झटणारे, झगडणारे महामानव होता, महामानव….
लेखन – गौतम कांबळे, सहाय्यक शिक्षक, आजरा हायस्कूल, आजरा

Send
Previous Post

राज्यातील रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये भरीव वाढ.

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी तब्बल सहा तास केले वाचन..

Gopal Gadkari

Gopal Gadkari

Next Post
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी तब्बल सहा तास केले वाचन..

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी तब्बल सहा तास केले वाचन..

पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा-खासदार डॉ. अमोल कोल्हे.

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com