भारताचे राष्ट्रनिर्माते . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१४ एप्रिल विश्वरत्न युगपुरुष, प्रज्ञासुर्य,महामानव, भारतरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांची १३४ वी जयंती संपूर्ण जगभरात तब्बल १५० देशामध्ये उत्साहात साजरी होत आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली मध्यप्रदेश ' महू ' या गावी एका अस्पृश्य कुळात झाला ज्यांचे स्थान गावकुसाबाहेर होते. पण आपल्या कर्तृत्वाने त्यांनी इतकी उंची गाठली की गावकुसा बाहेरचे काम पण देशाबाहेरचे विद्वान ही नतमस्तक झाले.
संत कबीर आपल्या एका दोह्यामध्ये म्हणतात
” जाती न पूछो साधू की, पूछ लिजिएज्ञान. मोल करो तलवारका पड़ा रहन दोम्यान “
म्हणजे – माणसाची श्रेष्ठता त्याने कोणत्या जातीत जन्म घेतला यावर अवलंबून नसून सर्वस्वी त्यांच्या ज्ञान आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. असे सांगणाऱ्या संत कबीराच्या दोह्या प्रमाणे ज्यांचे जीवन होते ते म्हणजे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.
बाबासाहेब म्हणजे काय?
हे सांगताना ‘ आचार्य अत्रे म्हणतात, बाबासाहेब म्हणजे बंड – मूतिमंत बंड, ज्यांच्या देहाच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते. बाबासाहेब म्हणजे कर्मकांडाच्या, जातीयव्यवस्था विरुध्द पुकारलेला एक बुलंद आवाज होय.
अॅन्टोनिया ग्रॅमसी नावाच्या विचारवंताने बाबासाहेबांचे वर्णन ‘ जैविक बुध्दिवंत ‘ म्हणून केले आहे. असा जैविक बुद्धिवंत जो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न्याय पद्धतीने राष्ट्रासमोर मांडतो आणि संपूर्ण देशाच्या प्रगतिसाठी झटतो आणि म्हणूनच भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर हे २० व्या शतकातील सर्वश्रेष्ठ बुद्धिवंत होते. भारताच्या राजकारणात, समाजकारण, अर्थकारण तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे देशाला असणारे योगदान अचंबीत करणारे आहे. म्हणूनय ख्यातनाम इतिहासतज्ञ,रामचंद्र गुहा आपल्या ‘ मॉडेल्स स्मेकर्स ऑफ इंडिया ‘ या ग्रंथात बाबासाहेबांचा उल्लेख ‘ आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते ‘ असा करतात.
बाबासाहेब हे एक महान समाजसुधारक, राजकिय विचारवंत होते, आर्थिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या कार्यामुळे आणि विचारामुळे भारतीय समाजाची प्रगती झाली आहे. बाबासाहेब एक जलतज्ञ होते देशातील पाण्याचे संकट दूर व्हावे म्हणून उत्कृष्ठ जल व्यवस्थापन केले या संदर्भात डॉ. सुखदेव थोरात यांनी लिहीलेल्या ‘ आंबेडकर रोल्स इन इकॉनॉमिक्स प्लानिंग अँड वॉटर पॉलीसी ‘ या इंग्रजी ग्रंथात ते म्हणतात – ‘ भारताच्या पहिल्या मुख्य धरणाची पायाभरणी बाबासाहेबांनी केली ‘ हिराकुड, दामोदर, सोन नद्यावरील ‘ नदीखोरे प्रकल्प ‘ मंत्री पदावर असताना प्रश्न मार्गी लावले.
शेती तज्ञ आणि शेतकऱ्यांचा नेते होते शेती विषयक मुल्य सारणीचे स्वतंत्र असे चिंतन केले शेती ही शास्त्रशुद्ध आणि आधुनिक पद्धतीने केली जावी यासाठी शेतकर्यांना प्रशिक्षण दिले जावे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा शेती सिंचन सुविधा निर्माण करणे शेतीला पुरक उद्योगाची जोड देणे, आस्मानी संकटात मदत करणे शेतकर्यांची आर्थिक कुवत बघुन त्यांच्यावर कर आकारणी करणे.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारने जमीनदारी नष्ट केली मोठ्या प्रमाणावर जमीनीचे वाटप केले. देशामध्ये कुळ कायदा हा बाबासाहेबांमुळे आला त्यांच्या विचारामुळे बी – बियाने, खते, कर्ज, कृषी उत्पादने समित्या यांची सोय झाली. बाबासाहेब हे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ होते. अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या परदेशात डॉक्टरेट पदवी मिळविणारे ते पहिले भारतीय होते.
बाबासाहेब हे थोर शिक्षणतज्ञ होते दलित वर्गासाठी शिक्षण संस्था, पिपल्स् एज्यूकेशन सोसायटी या संस्थेद्वारे देशात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले जावे यासाठी आवाज उठविणारे बाबासाहेब होय.
थोर घटनातज्ञ होते भारतीय राज्य घटना हा देशाचा सर्वाच्य कायदा आहे भारतीय संविधानातून बाबासाहेबांनी देशातील प्रत्येक घटकाला समान अधिकार, हक्क स्वातंत्र्य न्याय मिळवून दिला म्हणूनच घटनेचे शिल्पकार ठरले त्यांच्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा, लिहीण्याया जगण्याचा, व्यवसाय करण्याचा प्रबोधन करण्याचा शिक्षण, संघटीत धर्म चिकित्सा करण्याचे स्वातंत्रय मिळाले.
पूर्वी कामगाराना बारा तास काम करावे लागत होते ते आता फक्त आठ तास काम करावे लागते, बोनस, ग्रॅज्यूएटी, पेन्शन, स्रीयांना मतदानाचा हक्क समान वेतन अधिकार आरक्षण,भर पगारी प्रसुती रजा मिळण्याचा अधिकार राज्य घटनेतून मिळवूनदेण्याचे कार्य बाबासाहेबांनी दिले.
डॉ. बाबासाहेब हे थोर पत्रकार होते. वृत्तपत्राच्या माध्यमातून वंचित व शोषितांचा आवाज बुलंद करणारे थोर संपादक होते. त्यांनी मुकनायक, जनता, समता, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत या मराठी नियतकालिकांचे संपादन केले व देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांवर आपले अनमोल विचार मांडले व समाजपरिवर्तन घडविले.
बाबासाहेब हे एक महान लेखक होते त्यांची ग्रंथ संपदा विपुल प्रमाणात आहे. एकूण 32 ग्रंथ १० शोधनिबंध१0 निवेदने एवढा मोठा ग्रंथसंग्रह त्यांनी इंग्रजी भाषेत लिहीला एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेबां बाबासाहेबांनी केले ते बहुमुखी होते मराठी, संस्कृत पाली, इंग्रजी, फ्रेंच, हिंदी जर्मन, गुजराती, बंगाली, तमीळ, कन्नड, पारशी एवढ्या भाषा जाणनारे थोर विद्वान होते.
डॉ. आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ आंतराष्ट्रीय समता दिन ‘ म्हणून घोषित केला आहे. तसेच २००४ साली कोलंबिया विद्यापीठाने जगातील टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली त्या यादीत पहिले नांव डॉ. भिमराव आंबेडकर यांचे होते.
जगातील सर्वात मोठी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी केली जाते व भारतात सर्वाधिक पुतळे आहेत. सर्वात मोठा पुतळा अमेरीकेतील मॅरीलँड राज्यात आहे स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी या नावाने या पुतळ्याला ओळखले जाते एकूण १३ एकरात स्मृती पार्क उभारण्यात आला आहे. असे हे जगातील एक महान व्यक्तीमहत्व आहे. राष्ट्रहित जपणारा राष्ट्रभक्त विचारवंत, संसदपट्टू प्रभावी वक्ता विविध ग्रंथांचा नित्यवाचक, थोर लेखक पुस्तकासाठी स्वतःच्या घरात ग्रंथालय उभा करणारा ग्रंथप्रेमी जगमान्य विद्वान, अनेक शिक्षण संस्थेचा दुरदृष्ठी संस्थापक, समाजभिमूख पत्रकार, अशा विविध गुणरूपी अलंकारांनी विभूषित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक लोकोत्तर तेजस्वी आणि वंदनीय पुरुषोत्तम होऊन महिले आहेत. म्हणूनच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते आहेत.
शेवटी….
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या मानुसकीची
तुम्ही देव नव्हता,देवदूतही नव्हता नव्हता
तुम्ही मानवतेसाठी झटणारे, झगडणारे महामानव होता, महामानव….
लेखन – गौतम कांबळे, सहाय्यक शिक्षक, आजरा हायस्कूल, आजरा
Discussion about this post