लातूर : लातूर येथील मनुर्भव प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीचे औचित् तालुक्यातील आलमला येथील महात्मा बसवेश्वर चौकात रविवारी (दि.२७) सायंकाळी ७ वाजता किरण कोरे यांचे व्याख्यान होणार आहे.
सरपंच विकास वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बसवेश्वर धाराशिवे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मांजरा कारखान्याची माजी संचालक जयशंकर हुरदळे, माजी सरपंच केशव पाटील, रमाकांत देशपांडे गुरुजी, सोसायटीचे संचालक रविशंकर अंबुलगे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवकुमार अंबुलगे यांनी दिली.
या व्याख्यानाचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनुर्भव प्रतिष्ठान, आलमला बचत गट लातूर व आलमला ग्रामस्थांनी केले आहे.
Discussion about this post