लातूर शहरातील गढूळ पाण्याचा प्रश्न – भिम आर्मीचे तीव्र भूमिकेचे इशारे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. नागरिक तेच पाणी जपून वापरत असताना, गेल्या महिन्यापासून मिळणारे पाणी गढूळ स्वरूपात पुरवले जात आहे. या गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, हे पाणी गढूळ असले तरी ते पिण्यायोग्य असल्याचे सांगण्यात आले. यावर भिम आर्मीच्या वतीने विनोद कोल्हे (मराठवाडा अध्यक्ष) यांनी आव्हान दिले आहे की, जर हे पाणी पिण्यायोग्य असेल, तर आयुक्त व सर्व संबंधित अधिकारी यांनी हे पाणी जनतेसमोर पिऊन दाखवावे.गेल्या आठवड्यात लातूरचे स्थानिक आमदार यांनी महानगरपालिकेच्या उपयुक्तांबरोबर बैठक घेऊन शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत सूचना केल्या. मात्र, गेल्या महिन्याभरापासून गढूळ पाणी येत असतानाही त्याकडे यापूर्वी लक्ष का दिलं गेलं नाही, हा मोठा प्रश्न आहे.या प्रश्नावर राजकारण सुरू असून, भाजपच्या लातूरमधील नेत्यांनी देखील आंदोलन करत स्थानिक आमदाराच्या फोटोवर गढूळ पाण्याने अभिषेक केला. हेच भाजप नेते तेव्हा गढूळ पाणी का पाहू शकले नाहीत, हा सवाल उपस्थित होतो. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे हे राजकारण लोकांना स्पष्टपणे दिसून येत आहे. या राजकारणात जनतेच्या आरोग्याचा कुठलाही विचार केला जात नाही.भिम आर्मीचा स्पष्ट इशारा आहे की, लातूर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार हे निष्क्रिय आहेत. जर पुढील काळात नागरिकांना शुद्ध पाणी मिळाले नाही, तर भिम आर्मीच्या वतीने आमदार व खासदार यांच्या निवासस्थानी तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि जर या गढूळ पाण्यामुळे एखाद्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाला किंवा जीवितहानी झाली, तर संबंधित महानगरपालिका आयुक्त व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.विनोद कोल्हेमराठवाडा अध्यक्षभिम आर्मी भारत एकता मिशन
Discussion about this post