
प्रतिनिधी : राजेंद्र टोपले , सुरगाणा
काल नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका व परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी गारांचाही मोठ्या प्रमाणात वर्षाव झाला. त्यामुळे आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी शेतात काढणीसाठी आलेला गहू वादळी वाऱ्याने आडवे पडले तसेच खळ्यावर काढून ठेवलेला गहुही भिजला. तालुक्यातील वांगण सुळे येथील शेतकरी एकनाथ लक्ष्मण टोपले व गावातील इतर शेतकऱ्यांच्या आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे. तर काही घरांचे कौले, पत्रे उडाले .
आदिवासी बांधवांच्या घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांनी मातीपासून विटा तयार केल्या होत्या .त्या सर्व विटा पावसाने भिजून विरघळून गेल्या आहेत. तसेच काही विटा विटभट्टीमध्ये भाजण्यासाठी भट्टी तयार केली होती ती या वादळी पावसाने विझली असून त्या विटा अर्धवट कच्च्या पक्क्या आहेत. जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा, तनस मोठ्या प्रमाणात भिजला आहे.
तसेच तालुक्यात इतरही ठिकाणी अचानक पावसाची वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडेही मोडून पडले.
या अचानक अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.
Discussion about this post