प्रतिनिधी | रामचंद्र नावकार
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सामाजिक भान ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सध्या देशाच्या सीमांवर तणावाचे वातावरण असताना, भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी बाळासाहेबांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे फटाके फोडू नयेत किंवा केक कापू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
त्याऐवजी गावागावांत ‘मेन टू मेन’ भव्यदिव्य तिरंगा घेऊन शांततापूर्ण देशभक्तीपर रॅलीचे आयोजन करावे, असेही त्यांनी आवाहन केले. यामध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त व समाजहिताचा संदेश पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांचे हे सकारात्मक आणि राष्ट्रहिताचे आवाहन सध्या समाजात व्यापक प्रतिसाद मिळवत आहे, आणि त्याचा आदर्श म्हणून अनेक कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
“देश प्रथम, सण नंतर” या भूमिकेतून हे आवाहन समाजप्रबोधनाचे उदाहरण ठरत आहे.


Discussion about this post