नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथे दिनांक ०९ मे २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता भारतीय सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले. सध्या पाकिस्तानविरुद्ध लढा देणाऱ्या तीनही सैन्य दलातील जवानांच्या साहस व त्यागास समर्थन दर्शविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली.
या मशाल यात्रेची सुरुवात गावातील हनुमान मंदिरापासून करण्यात आली. या वेळी तरुणांनी भारताचा तिरंगा ध्वज, भगवा झेंडा आणि मशाली घेऊन “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय जवान जय किसान”, “पाकिस्तान मुर्दाबाद”, “हिंदुस्तान जिंदाबाद” अशा राष्ट्रभक्तीपर घोषणा दिल्या.
गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला होता. यात्रेच्या सांगतेवेळी हनुमान मंदिर परिसरात सामूहिकरित्या हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यानंतर भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अखेरीस राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रेरणादायी मशाल यात्रेचे आयोजन रामेश्वर हापसे, गणेश शिंदे, सागर शिंदे आणि अंकुश शिंदे या तरुणांनी केले होते. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत देशभक्तीचा अभिमान व्यक्त केला.
अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Discussion about this post