

या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व साने गुरुजी यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे महामित्र दत्ता वायचळे म्हणले .स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला.
विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. असे. काॅम्रेड हरिभाऊ तांबे म्हणले. स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले असे विजय मुठे म्हणले सर्वानी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हणली अशा महान विचारवंत साने गुरूजी यांना विनम्र अभिवादन यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन विजय मुठे तर प्रास्ताविक हरिभाऊ तांबे यांनी केले व आभार अजय शिंदे यांनी मानलेयाप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे,काॅम्रेड हरिभाऊ तांबे आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,प्रकाश माळी, अनिल लोणारे, भास्कर इंगळे,नामदेव कुटे,खंडू गिते,धनंजय परदेशी, अजय शिंदे, गणपत काळे,राजेंद्र देशमुख, नाना माळी पांडूरंग चकोर, राजेंद्र सातपुते,उद्धव माळी आदि.उपस्थित होते.
Discussion about this post