महाराणा प्रताप यांची जयंती व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड च्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले* या कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप व भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली भारतीय शहीद जवान व निष्पाप नागरिक मृत्यू झाल्याबद्दल बळींना आदरांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली महाराणा प्रताप देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व करणारे आणि हल्दीघाटीच्या युद्धात मुघल सम्राट अकबरासोबत लढणारे खरे देशभक्त मानले जातात. महाराणा प्रताप त्यांच्या शौर्याचे प्रचंड कौतुक करावे तितकेच,कमी आहेत त्यांनी मोठ्या संख्येने विरोधकांना मारण्यात यश मिळविले. जानेवारी १५९७ मध्ये, महाराणा प्रताप वयाच्या ५६ व्या वर्षी आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या अभिमानासाठी लढताना त्यांचे निधन झाले. महाराणा प्रताप यांनी मुघलांविरुद्ध अनेक लढाया केल्या आणि त्यांच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी कधीही त्यांची मदत घेतली नाही. त्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले तसेच भाऊराव पाटील शिक्षणक्रांतीचे कर्मवीर हे आदर्श व्यक्तीमत्व होते. बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी देणारे ते एक महान धन्वंतरी होते. गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणारे एक आधुनिक भगीरथ होते. अज्ञान, अंधश्रध्दा आणि जाती-धर्माने पहुडलेल्या समाजाला त्यांनी ज्ञानाचे अमृत पाजून त्यातून बाहेर काढले.

संपुर्ण आयुष्य त्यांनी शिक्षणप्रसाराला वाहून दिले. तन मन धन त्यासाठी अर्पण केले. शिक्षणाबरोबरच स्वावलंबन शिकवले. श्रम शिक्षणातून स्वावलंबन, प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करुन तरुणांना मुख्य प्रवाहात आणले. शिक्षणाची संधी मिळू न शिकणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली. महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराची एक अखंड चळवळ निर्माण केली. त्यासाठी त्यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका सारखी उत्कृष्ट पध्दत सुरु करुन सर्वांना शिक्षण क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न केला.अशा महान युध्द महाराणा प्रताप व कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे, हरिभाऊ तांबे विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुञसंचलन किरण मुठे तर प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.व आभार शरद जाधव यांनी मानले या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,काॅम्रेड हरिभाऊ तांबे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे बाळासाहेब मुठे,,लखन पाचोरे,किरण मुठे,अजय गांगुर्डे,राकेश रायकर,भुषण गोरे,विनोद हांडोरे, बबलु गिते, मंगेश मोरे,प्रकाश गुंजाळ, शरद जाधव, चेतन शहाणे, ऋषि भगत,विजय यादव आदी.उपस्थित होते.
प्रतिनिधी:- कैलास तळपाडे (8379905625).
Discussion about this post