भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
शासनाने युध्दाच्या कालावधी मध्ये शासकीय, निमशासकीय गणवेशधारी संघटनेच्या सेवा निवृत्त सदस्यांना कर्तव्यावर बोलवावे.अशी मागणी मुंबई कांदिवली येथील जेष्ठ पत्रकार भारत कवितके यांनी केलेली आहे.सध्या भारत पाकिस्तान युद्ध चालू असून भारताचे सिंदुर आप्रेशन यशस्वी पणे पार पडले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.भारताने पाकिस्तानचे हल्ले परतून पाकिस्तानात घुसून घुसून हल्ले करून सळो की पळो करून सोडले.अशा युध्दाच्या कालावधीत सैनिक, पोलीस यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.व कर्तव्यावर तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अशा वेळी देशातील प्रशासकीय ठिकाणे, रेल्वे स्थानके,बस स्थानके, विमानतळ, पर्यटन स्थळे, मंदिर, प्रार्थना स्थळे, सार्वजनिक ठिकाणे अशा विविध ठिकाणी पोलीसां सोबत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष काळजी पूर्वक लक्ष ठेवण्यासाठी सेवा निवृत्त सैनिक, पोलीस, होमगार्ड ,नागरी संरक्षण दल,अशा गणवेश धारी संघटनेच्या सदस्यांना कर्तव्यावर बोलवावे.

कारण या सर्वांना भरतीपूर्वी सांगितले जाते की, देशावर संकट, आपत्ती आल्यास आपण सेवा निवृत्त झाला असला तरी आपणास कर्तव्यावर बोलाविले जाईल.तेव्हा आपण आदेशाचे पालन केले पाहिजे.सध्या युध्दाच्या कालावधीत शासनाने गणवेश धारी संघटनेच्या सेवा निवृत्त सदस्यांना कर्तव्यावर स्थानिक संवेदनशील ठिकाणी कर्तव्ये द्यावीत.अशी मागणी मुंबई कांदिवली येथील पत्रकार भारत कवितके यांनी केली आहे.भारत कवितके हे होमगार्ड संघटनेचे २९ वर्षे सदस्य होते.समादेशक अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले.
Discussion about this post