नागरिकांनी आपत्ती काळात प्रशासनाने दिलेल्या सूचना ,निर्देश यांचे पालन करून सहकार्य करावे, अफवांवर विश्वास देऊ नये ,शांतता राखून सहकार्य करावे; आयुक्त सत्यम गांधी (IAS)
भारत पाकिस्तान या दोन देशा दरम्यान सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या तणावावरून मंगलधाम येथे महापालिका, पोलिस आणि महसूल प्रशासनाची एक तत्काळ संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आयुक्त सत्याम गांधी यांच्यासह विभागीय पोलिस अधिकारी आणि आर. विमला गृह विभागाचे उपअधीक्षक दादासो चुडाप्पा यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त विजया यादव, शिल्पा दरेकर स्मृती पाटील वैभव साबळे आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये भविष्यातील परिस्थिती बाबत उहापोह करण्यात आला तसेच कोणत्याही परिस्थिती मध्ये नागरिकांनी कोणताही संदेश व्हाट्सअअप वर किंवा
अन्य सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी समाजामध्ये असंतोष निर्माण होईल, गैर समज निर्माण होईल असे पोलीस यंत्रणा सर्व बाबीवर लक्ष केंद्रित करून असणार आहे, नागरिकांनी आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर निदर्शनास आल्या नंतर लगेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन यावेळी विभागीय पोलीस अधिकारी आर विमला . बोर्ड फलक ,बॅनर ,डिजिटल हे परवानगी घेतल्या शिवाय प्रसिध्द करू नये ,कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी परवानगी घेऊनच प्रसिद्धी करावी असे स्पष्टपणे आदेश आजच्या बैठकीत देण्यात आले.
कोणत्याही परिस्थितीत दोन समाजामध्ये द्वेष निर्माण होऊन,अशी चुकीची माहिती प्रसारित ,प्रसिद्ध करू नये , नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना, आदेश ,निर्देश यांचे काळजीपूर्वक पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे अहवान मा सत्यम गांधी आयुक्त यांनी केले आहे.
Discussion about this post