शाळेत पाणी थांबल्याने आले तळयाचे स्वरूप….
याकडे शालेय व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष समिती नावालाच
बाबूराव बोरोळे
सारथी न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी लातूर
डिगोळ : दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस होत असून या रिमझिम पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रवेशद्वारावर पाणी थांबल्याने व चिखलाची घसरगुंडी झाल्याने शालेय बाल चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांना चक्क पाण्यातून शाळेत ये जा करण्यासाठी परेशान व्हावे लागत आहे याकडे शालेय व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष झाले आहे कि काय समिती नावालाच झाली आहे.
उदगीर नळेगाव लातूर हा जाणारा राज्य मार्गावर बनला असून डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही रोड टच आदर्श शाळा आहे. या राज्य मार्गाची उंची वाढली तर शाळेचे प्रवेश द्वार उंच झाले आहे तर शाळेचा रस्ता खोलवर झाला असल्याने शालेय विद्यार्थ्यांना घसरगुंडी घेत पाण्यातून ये जा करावे लागत आहे
व शाळेच्या कंपाऊंड आत घाणीचे साम्राज्य वाढले असून दुर्गंधी पसरली आहे शाळा बंद असताना शाळेच्या गेटवर चढून शाळेत प्रवेश करणे शाळेत घाण करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत परंतु याकडे शालेय व्यवस्थापन समितीचे सर्रास दुर्लक्ष झाले आहे कि काय समिती नावालाच असा सुर पालकांकडून निघत आहे.
फोटो ओळ. राज्य मार्गावर झाला उंच डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा प्रवेशद्वार खोलवर झाला असल्याने रिमझिम पावसाचे पाणी साचत आहे
Discussion about this post