• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुकडीतून विसापूर धरणात पाणी सोडण्याचा निर्णय; आ. विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः येडगाव धरणात ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्यानंतर कुकडी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी विसापूर धरणात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीगोंदा-नगर मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.

RelatedPosts

श्रीवर्धनमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिवसेनेचा आवाज; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत शिक्षण विभागाला निवेदन

शिष्यवृत्ती परीक्षेत रांजणगाव प्राथमिक शाळेची सलग तिसऱ्या वर्षी गुणवत्तेची चमक; १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात पुण्यात पालख्यांचे जल्लोषात आगमन; भक्तीमय वातावरणाने पुण्यनगरी दुमदुमली

आमदार पाचपुते यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून विसापूर धरणाची सद्यस्थिती आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याची गरज निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कुकडी प्रकल्पातून विसापूर धरणात पाणी सोडण्यास प्रशासनाने मंजुरी दिली.

या निर्णयामुळे विसापूर कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना खरीप तसेच आगामी रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा मिळणार असून सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले…

“कुकडी प्रकल्पात पाण्याची चांगली आवक होत असताना त्याचा फायदा आपल्या भागातील शेतकऱ्यांना होणे गरजेचे होते. यासाठी मी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. प्रशासनाने पाणी सोडण्यास मंजुरी दिली असून यामुळे आपल्या भागातील बळीराजाला मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी आमचे प्रयत्न यापुढेही सातत्याने सुरू राहतील.”

Previous Post

NH-965G वरील जीवघेण्या त्रुटी तातडीने दूर करा; अन्यथा १६ जुलैला ‘रस्ता रोको’ आंदोलन – शिवसेनेचा NHAI ला इशारा

Next Post

गोखले कॉलेजसमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शिवसेनेचा संताप; १५ ऑगस्टपर्यंत परिसर स्वच्छ करण्याचा इशारा

Related Posts

Blog

श्रीवर्धनमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिवसेनेचा आवाज; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत शिक्षण विभागाला निवेदन

July 10, 2026
2
Blog

शिष्यवृत्ती परीक्षेत रांजणगाव प्राथमिक शाळेची सलग तिसऱ्या वर्षी गुणवत्तेची चमक; १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

July 10, 2026
2
Blog

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात पुण्यात पालख्यांचे जल्लोषात आगमन; भक्तीमय वातावरणाने पुण्यनगरी दुमदुमली

July 9, 2026
4
Blog

मोशी कचरा डेपो दुर्घटना; २५ तासांनंतरही बचावकार्य सुरू, आठ जण अडकल्याची भीती

July 9, 2026
5
Blog

गोखले कॉलेजसमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शिवसेनेचा संताप; १५ ऑगस्टपर्यंत परिसर स्वच्छ करण्याचा इशारा

July 9, 2026
4
Blog

NH-965G वरील जीवघेण्या त्रुटी तातडीने दूर करा; अन्यथा १६ जुलैला ‘रस्ता रोको’ आंदोलन – शिवसेनेचा NHAI ला इशारा

July 9, 2026
2
Next Post

गोखले कॉलेजसमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शिवसेनेचा संताप; १५ ऑगस्टपर्यंत परिसर स्वच्छ करण्याचा इशारा

ताज्या बातम्या

श्रीवर्धनमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिवसेनेचा आवाज; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत शिक्षण विभागाला निवेदन

July 10, 2026

शिष्यवृत्ती परीक्षेत रांजणगाव प्राथमिक शाळेची सलग तिसऱ्या वर्षी गुणवत्तेची चमक; १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

July 10, 2026

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात पुण्यात पालख्यांचे जल्लोषात आगमन; भक्तीमय वातावरणाने पुण्यनगरी दुमदुमली

July 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In