
दर्यापूर | प्रतिनिधी :
दर्यापूर येथील अयोध्या नगर परिसरात पावसाळ्याचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली तसेच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.
या उपक्रमात शरदभाऊ सहगल, दीपक मेश्राम, देवेंद्र आपोतिकार, हरिभाऊ पवार, अंजली सहगल, पूर्वा मेश्राम, नित्याश मेश्राम, सौ. तेजस्विनी मेश्राम, सौ. ज्योतीताई सहगल आणि येवले काका यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. “केवळ वृक्ष लावणे पुरेसे नसून, ते जगवणे ही काळाची गरज आहे,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
पर्यावरणपूरक उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अयोध्या नगरातील नागरिकांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भविष्यातही अशाच वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जागृतीच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
