• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कवठे महांकाळ तालुक्यात पावसाने दडी मारली; पाणीटंचाईमुळे खरीप हंगाम धोक्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

कवठे महांकाळ | प्रतिनिधी

कवठे महांकाळ तालुक्यात यंदा मान्सूनने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून पाणीसाठ्यांमध्ये मोठी घट झाल्याने खरीप हंगामासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

RelatedPosts

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक निधीतून हळदवाही (टोला) येथे सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

चामोर्शीचे अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; “जनतेचा वनवास केव्हा संपणार?” नागरिकांचा संतप्त सवाल

धोकादायक झाडांवर तातडीने कारवाईची मागणी; नगरसेविका अंकिता निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

पाणीटंचाईचे गंभीर संकट

तालुक्यातील अग्रणी नदीपात्रातील मळणगाव, शिरढोण, तिरमलवाडी, मोरगाव, हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, धुळगाव आणि रांजणी येथील बंधारे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या विहिरींची पाणीपातळीही तळाला गेल्याने अनेक गावांतील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांवर संकट ओढवले आहे.

तालुक्यातील १० लघू आणि एका मध्यम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठाही लक्षणीयरीत्या घटला आहे. लांडगेवाडी तलावात केवळ मृतसंचयी पाणीसाठा शिल्लक असून इतर तलावांमधील पाणीसाठाही मर्यादित आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतीवर मोठा परिणाम

दरवर्षी म्हैसाळ योजनेतून अग्रणी नदीपात्रात पाणी सोडले जात असल्याने परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात राहत होती. मात्र यंदा अद्याप पाणी न सोडल्याने नदीपात्र कोरडे पडले असून घाटमाथ्यावरील गावांनाही पाण्याचा फटका बसत आहे.

गतवर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यात सुमारे ८९ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली होती. यंदा मात्र पावसाच्या ओढीमुळे पेरण्या लांबल्या असून पाणीअभावी सोयाबीन, मका, तूर आणि भुईमूग यांसारखी खरीप पिके धोक्यात आली आहेत.

शेतकऱ्यांची मागणी

पाण्याची तातडीने उपलब्धता करून द्यावी तसेच म्हैसाळ योजनेतून अग्रणी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाणी न मिळाल्यास शेती वाचविण्यासाठी पर्यायी उपाययोजनांची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अग्रणी नदी बारमाही झाल्यास हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन तालुक्याला दुष्काळमुक्ती मिळू शकते, असे मतही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Tags: Sunil Kengar
Previous Post

नवेगाव–उंबरवाडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; ९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चाचा इशारा

Next Post

जाखापूर गावावर शोककळा; अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Related Posts

Blog

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक निधीतून हळदवाही (टोला) येथे सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

July 15, 2026
1
Blog

चामोर्शीचे अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; “जनतेचा वनवास केव्हा संपणार?” नागरिकांचा संतप्त सवाल

July 15, 2026
2
Blog

धोकादायक झाडांवर तातडीने कारवाईची मागणी; नगरसेविका अंकिता निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

July 15, 2026
2
Blog

अमरावती जिल्ह्यात पावसाची ओढ; पिकांवर परिणाम, शेतकरी चिंतेत

July 15, 2026
1
Blog

जाखापूर गावावर शोककळा; अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

July 15, 2026
27
Blog

नवेगाव–उंबरवाडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; ९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चाचा इशारा

July 15, 2026
11
Next Post

जाखापूर गावावर शोककळा; अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक निधीतून हळदवाही (टोला) येथे सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

July 15, 2026

चामोर्शीचे अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; “जनतेचा वनवास केव्हा संपणार?” नागरिकांचा संतप्त सवाल

July 15, 2026

धोकादायक झाडांवर तातडीने कारवाईची मागणी; नगरसेविका अंकिता निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

July 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In