• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवेगाव–उंबरवाडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; ९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

ता. पातूर | प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील नवेगाव–उंबरवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध गावठी दारूविक्रीविरोधात महिला व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या पुढाकाराने प्रशासनाकडे निवेदन देत अवैध दारूविक्री तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक निधीतून हळदवाही (टोला) येथे सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

चामोर्शीचे अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; “जनतेचा वनवास केव्हा संपणार?” नागरिकांचा संतप्त सवाल

धोकादायक झाडांवर तातडीने कारवाईची मागणी; नगरसेविका अंकिता निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, परिसरात अनेक दिवसांपासून अवैध दारूची विक्री सुरू असून त्यामुळे तरुणांमध्ये आणि अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. अनेक कुटुंबांवर त्याचे गंभीर परिणाम होत असून दारूच्या नशेत वाहन चालविण्यामुळे अपघातांची संख्याही वाढत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

नागरिकांनी यापूर्वीही संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्याचा दावा करत, अपेक्षित कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अवैध दारूविक्री तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात २९ जून २०२६ रोजी सावरगाव–झरंडी मार्गावर झालेल्या भीषण अपघाताचाही उल्लेख करण्यात आला आहे. या अपघातात आकाश शेषराव शिंदे आणि अजय चोंढकर या दोन युवकांचा मृत्यू झाला, तर तिसरा युवक गंभीर जखमी होऊन नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवैध दारूविक्रीवर प्रभावी नियंत्रण नसल्याबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, अकोला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आल्याची माहिती देत, तातडीने कारवाई न झाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी आलेगाव, कार्ला, गोळेगाव, पाडशिंगी, सावरगाव, झरंडी, नवेगाव, उंबरवाडी, अंधारसांगवी, पांढुर्णा, सोनुना, पिंपळडोळी आदी गावांतील महिला-पुरुषांच्या सहभागातून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

या वेळी दुर्गाबाई ठाकरे, लताबाई डुकरे, शीतल धंदरे, रूपाली वाथे, शोभा डाखोरे, शालिनी वाथे, कमलाबाई ताजने, लक्ष्मीबाई तिवाले, पारूबाई गायकवाड, कमलाबाई धंदरे, रुक्मा शिंदे, निलेश तोताराम कापकर, समाधान शिंदे आणि समाधान गाढवे यांच्यासह अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

NH-965G वरील अपघात रोखण्यासाठी शिवसेनेचा एल्गार; उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा, आज शेगावात NHAI अधिकाऱ्यांची बैठक

Next Post

कवठे महांकाळ तालुक्यात पावसाने दडी मारली; पाणीटंचाईमुळे खरीप हंगाम धोक्यात

Related Posts

Blog

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक निधीतून हळदवाही (टोला) येथे सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

July 15, 2026
0
Blog

चामोर्शीचे अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; “जनतेचा वनवास केव्हा संपणार?” नागरिकांचा संतप्त सवाल

July 15, 2026
0
Blog

धोकादायक झाडांवर तातडीने कारवाईची मागणी; नगरसेविका अंकिता निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

July 15, 2026
2
Blog

अमरावती जिल्ह्यात पावसाची ओढ; पिकांवर परिणाम, शेतकरी चिंतेत

July 15, 2026
1
Blog

जाखापूर गावावर शोककळा; अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

July 15, 2026
22
Blog

कवठे महांकाळ तालुक्यात पावसाने दडी मारली; पाणीटंचाईमुळे खरीप हंगाम धोक्यात

July 15, 2026
4
Next Post

कवठे महांकाळ तालुक्यात पावसाने दडी मारली; पाणीटंचाईमुळे खरीप हंगाम धोक्यात

ताज्या बातम्या

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक निधीतून हळदवाही (टोला) येथे सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

July 15, 2026

चामोर्शीचे अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; “जनतेचा वनवास केव्हा संपणार?” नागरिकांचा संतप्त सवाल

July 15, 2026

धोकादायक झाडांवर तातडीने कारवाईची मागणी; नगरसेविका अंकिता निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

July 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In