वडाळा ता उ सोलापूर
भागातील 10 गावासाठी वडाळा मंडळ व तलाठी कार्यालय आहे व इतर गावात तलाठी कार्यालय आहेत.
भागातील सर्व गावात खरेदी विक्री, बोजा नोंद वारस नोंदीचे अर्ज करण्यासाठी शासनाने ऑनलाईन सुविधा सर्व महासेवा केंद्र, आपले सरकार केंद्र ई हक्क प्रणाली असा अनेक सुविधा केंद्रावरून सर्व शेतकरी यांना अर्ज करता येतोय अशा अनेक सुविधा असताना सुद्धा अनेक शेतकरी यांना तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय दररोज हेलपाटे मारावे लागतात .
हे शेतकरी यांचे दुर्दैव म्हणावे लागेल आता शेतात पेरणी नाही, पाऊस नाही, असा नैसर्गिक आघात आणि प्रशासन यांचा त्रास हे शेतकरी यांच्या पाचवीला पूजलेला आहे.
अनेक शेतकरी यांना कर्ज माफी साठी वारस नोंद, पेरणी साठी बोजा घेणे साठी बोजा नोंद असा अनेक प्रश्न शेतकरी या आवसून उभे आहेत. तरी निघर घट प्रशासन ला त्याचे काय घेणे देणे नाही.
सरकार म्हणते नोंद 16 दिवसात मंजूर होते.
भागातील आपलें चावडीवर पहिलेअसता 1 महिना लागतोय. वारील 15 दिवसाचे गोडबंगाल काय समजत नाही. या नोंदी मुळे कर्ज कर्ज माफी अशा किरकोळ कामे होत नाही.
तरी मा तहसीलदार, मा जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे दप्तर तपासणी करून कार्यवाही करण्यात यावी.









