पुणे : प्रतिनिधी
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून AviRath Global Foundation च्या वतीने आज दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
आंबेगाव–नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराच्या ट्रॅक साइड परिसरात सकाळी ८ ते ९ या वेळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनचे सदस्य, हितचिंतक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपण केले.
“पर्यावरणासाठी एक पाऊल” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरणाचे संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यात आला. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आरोग्य, शिक्षण आणि वृद्धाश्रम या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या AviRath Global Foundation च्या या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती:
श्री. हरीश सूर्यवंशी, श्री. प्रवीण भोसले, श्री. राजेंद्र पाठक, सौ. सरिता पाठक, श्री. संदीप जाजूरे व इतर मान्यवर.
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशसेवेसोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.












