गोविंदपूर/ प्रतिनिधी ( अविनाश सावंत)
कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा धाराशिव जिल्हा अंतर्गत, देहूरोड शाखा संरक्षण सचिव तथा समता सैनिक दलाचे जवान कालवश आप्पासाहेब उत्तम वाघमारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त गोविंदपुर तालुका, जिल्हा धाराशिव येथे रविवार दिनांक २३ ऑगष्ट २०२६ रोजी धाराशिव जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण धावारे यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली सभा व समता सैनिक दल एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले,
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संरक्षण उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर पी.एस. ढोबळ व मेजर जनरल एम.डी.लोंढे यांच्या मार्गदर्शन केले ,
गोविंदपुर व पंचक्रोशीतील युवक – युवतींना समता सैनिक दलाचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला,
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या व वाघमारे परिवाराच्या वतीने आदर्शाचे व कालवश आप्पासाहेब उत्तम वाघमारे यांच्या प्रतिमेचे दिप धुप व पुष्पांनी पुजन करून भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम देहूरोड शाखा अध्यक्ष, समता सैनिक दलाचे प्लाटुन कमांडर तथा बौद्धाचार्य प्रकाश चां.कांबळे यांनी सुत्तपठृण घेतले तर शिबिराचे उद्घाटन व ध्वजारोहण असिस्टंट स्टाफ ऑफिसर पी.एस. ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले,
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने धाराशिव महिला अध्यक्षा राजश्रीताई कदम , सरचिटणीस दिलीप निकाळजे, संरक्षण उपाध्यक्ष सिद्धार्थ उबाळे, संस्कार उपाध्यक्षा शामल कांबळे, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष हनुमंत प्रतापे,
गोविंदपुर गावचे सरपंच आशोक मस्के,
धाराशिव जिल्हा पुरुष व महिला पदाधिकारी यांनी कालवश आप्पासाहेब उत्तम वाघमारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शब्द रुपी आदरांजली वाहिली,
समता सैनिक दलाचे सैनिक ग्रामस्थ, वाघमारे परिवार आप्तेष्ट मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते,
याप्रसंगी शिबिरार्थिंना प्रशिक्षण देत असताना पी. एस.ढोबळे म्हणाले बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना २० मार्च २०२७ रोजी करत असताना महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे करार अशा अणेक आंदोलनात समता सैनिक दलाच्या सैनिकांनी निकराने लढा देऊन सैनिकाची शिस्त,संयम आणि लढाऊ वृतीने स्वसंरक्षणासोबत समाज संरक्षणासाठी मोठे योगदान दिले आहेत व बाबासाहेबांनी केलेली आंदोलने यशस्वी केली आहेत, येणाऱ्या २० मार्च २०२७ रोजी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह शताब्दी वर्धापन दिनानिमित्त समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांनी १ लाख सक्रिय सैनिकांची फळी तयार करून घर तेथे सैनिक व गाव तेथे शाखा निर्माण करावीत यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २ हजार सैनिकांची फोर्स तयार करून देशातील विषमता नष्ट करण्यासाठी संविधान के सन्मान में समता सैनिक दल मैदान में या कार्याची अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे याकरिता प्रशिक्षित शिक्षकांद्वारे मार्शल आर्ट,भाला फेक,गोळा फेक, क्रीडा स्पर्धा, साप्ताहिक परेड ,ड्रिल स्पर्धा आयोजित करून युवक युवतींना करीयर मार्गदर्शन व स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात यावे तेंव्हाच ख-या अर्थाने सुसंस्कृत समाज निर्माण होईल असे मत महाराष्ट्र राज्य संरक्षण उपाध्यक्ष पी.एस.ढोबळे यांनी मांडले,
समता सैनिक दल शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या कालवश आप्पासाहेब उत्तम वाघमारे यांच्या भगिनी रेखा अविनाश गायकवाड यांचा भारतीय संविधान व धम्म संस्कार पाठ पुस्तक दिले तसेच कालवश आप्पासाहेब उत्तम वाघमारे यांच्या पत्नी कविता व दोन मुले संविधान व प्रज्ञान यांना भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा कार्यकारिणी व समता सैनिक दल पुणे जिल्हा यांच्या वतीने सैनिक कृतज्ञता सहाय्य निधी पी एस ढोबळे सर,मेजर जनरल एम.डी.लोंढे देहूरोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला,
शिबिराचा सांगता समारोह संपन्न होत असताना सहभागी शिबिरार्थिंची मनोगत व्यक्त केली आणि शिबिराचे प्रशिक्षक एम डी लोंढे यांनी समता सैनिक दलाची प्रतिज्ञा घेतली व शिबिर संपन्न करण्यात आले,
प्रकाश कांबळे यांनी कालवश आप्पासाहेबांच्या आठवणी कवितेच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.










