• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाने दडी मारल्याने धारासूर परिसरातील खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
पावसाने दडी मारल्याने धारासूर परिसरातील खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

धारासूर : जवळच गोदावरी नदीत मुबलक पाणी उपलब्ध असतानाही विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना विहीर व नदीवरील पंप सुरू करून पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी विद्युत मोटारीवर अवलंबून आहेत. मात्र वीजपुरवठा नियमित नसल्याने उपलब्ध असलेले पाणीही पिकांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत.
“गोदावरीत पाणी, शेतात पिकं करपली; पाऊस नाही आणि वीजही नाही—शेतकऱ्यांची अवस्था झाली दयनीय!” असे मत शेतकरी परमेश्वर कदम यांनी व्यक्त केले. “पाणी डोळ्यासमोर आहे, गोदावरी वाहतेय; मात्र वीजपुरवठा नसल्यामुळे शेतात पाणी देता येत नाही. त्यामुळे गोदावरी असूनही आमच्या नशिबी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

RelatedPosts

ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञा प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन..!

वेळापूरच्या मातीतून परिवर्तनाचा जयघोष! 🚩

डॉक्टर आमदारांच्याच मतदारसंघात आरोग्य व्यवस्था आजारी, चामोर्शीतील माता-बाळ मृत्यूने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…..


पावसाअभावी पिकांची वाढ खुंटत असून अनेक ठिकाणी पिकांची पाने कोमेजू लागली आहेत. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही किंवा सिंचनासाठी पुरेसा वीजपुरवठा मिळाला नाही, तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संबंधित वीज विभागाने धारासूर परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी नियमित वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गोदावरी नदीचे पाणी उपलब्ध असताना केवळ वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे पिके वाया जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

खंडणी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रेत्यास पकडून दिल्याचा प्रकार उघडकीस

Next Post

श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सेवेसाठी पुढाकार

Related Posts

ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञा प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन..!
Blog

ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञा प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन..!

August 25, 2026
0
Blog

वेळापूरच्या मातीतून परिवर्तनाचा जयघोष! 🚩

August 25, 2026
1
डॉक्टर आमदारांच्याच मतदारसंघात आरोग्य व्यवस्था आजारी, चामोर्शीतील माता-बाळ मृत्यूने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…..
Blog

डॉक्टर आमदारांच्याच मतदारसंघात आरोग्य व्यवस्था आजारी, चामोर्शीतील माता-बाळ मृत्यूने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…..

August 25, 2026
1
Blog

जि. प. प्रा. शा. जडगावचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम !

August 25, 2026
5
रिसोड शहरात अनेक मोठ्या कावड काढण्यात आला.
Blog

रिसोड शहरात अनेक मोठ्या कावड काढण्यात आला.

August 25, 2026
10
Blog

परतूर येथे २६ ऑगस्टला इस्कॉनतर्फे ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव’; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

August 25, 2026
2
Next Post
श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सेवेसाठी पुढाकार

श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सेवेसाठी पुढाकार

ताज्या बातम्या

ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञा प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन..!

ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञा प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन..!

August 25, 2026

वेळापूरच्या मातीतून परिवर्तनाचा जयघोष! 🚩

August 25, 2026
डॉक्टर आमदारांच्याच मतदारसंघात आरोग्य व्यवस्था आजारी, चामोर्शीतील माता-बाळ मृत्यूने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…..

डॉक्टर आमदारांच्याच मतदारसंघात आरोग्य व्यवस्था आजारी, चामोर्शीतील माता-बाळ मृत्यूने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…..

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In