पाथरी-
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
आमदार सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ग्रामीण भागातील युवकांचा शिवसेनेकडे वाढता कल
पाथरी : पाथरी व मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांमधील युवक, कार्यकर्ते व नागरिकांनी आमदार सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. याच कार्यक्रमात विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना आमदार सईद खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
युवा सेना जिल्हाप्रमुख पवन डुकरे यांच्या संघटनात्मक कार्यशैलीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून यश मिळाले असून, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने शिवसेनेशी जोडले जात असल्याचे यावेळी दिसून आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवा सेना जिल्हाप्रमुख पवन डुकरे यांनी केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अनंतराव वाकणकर तसेच नगरसेवक गोविंद हरकळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आमदार सईद खान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पक्षप्रवेश करणाऱ्या नव्या सहकाऱ्यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा रुमाल घालून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार सईद खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनियुक्त पदाधिकारी
– मुकेश श्रावणे — युवा सेना उपजिल्हाप्रमुख, ओबीसी सेल
– सोमेश्वर श्रावणे — युवा सेना तालुकाप्रमुख, पाथरी, ओबीसी सेल
– संतोष कोरडे — युवा सेना तालुकाप्रमुख, मानवत
– अमोल घाटूळ — युवा सेना तालुका संघटक, मानवत
– श्याम डुकरे — युवा सेना उपतालुकाप्रमुख, पाथरी
कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते टाकळकर नाना, बाळूकाका, पत्रकार एल. आर. कदम, प्रमोद नवले,वैजनाथ कोल्हे, कृष्णा डुकरे,यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच पाथरी व मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या हजारो शिवसैनिकांची उपस्थिती कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली.
यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख खुर्शिद शेख यांनी केले.
“गावागावांत संघटन मजबूत, युवकांचा शिवसेनेकडे वाढता ओघ आणि आमदार सईद खान यांच्या नेतृत्वाला मिळणारा वाढता जनाधार” असा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.










