• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाच्या लहरीपणाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांना…

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

तालुका प्रतिनिधी । आदित्य अरुण जाधव.

RelatedPosts

साने गुरुजी विद्यालयात आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न……….

ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

दोन महिने उलटून गेल्यानंतरही, म्हणावा तितका जोरदार पाऊस न आल्यामुळे बळीराजा आता चिंताग्रस्त झालेला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या या अशा लहरीपणामुळे, बळीराजाच्या डोळ्यादेखत सोयाबीन पिकाने माना जवळपास टाकल्या आहेत, पीक वाळून जात असल्याचं चित्र सर्वत्र निर्माण झालेलं आहे. पावसाच्या तोंडावर बळीराजाने सोयाबीन पेरणी केली खरी, परंतु सोयाबीन पीक ऐन शेंगा भरण्याच्या स्थितीमध्ये असतांना, पावसाच्या न येण्याने, सोयाबीन पीक आता पूरते वाळून जात असल्याचं शेतकऱ्यांना पहावं लागत असल्यामुळें बळीराजा काळजीत पडला आहे.

उपजीविकेचं साधन शेतीच असल्यामुळे, शेतात पिकणाऱ्या पिकांवरच शेतकऱ्यांची आर्थिक गणितं ठरलेली असतात. मात्र पिकांच्या अशा नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडून तर जाईलच, शिवाय शेतकरी बांधव देखील पूर्णपणे कोलमडून जाण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अशा संपूर्ण परिस्थितीची माहिती घेऊन, शासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं, त्यांना आर्थिक पाठबळ देणं हे त्यांचं कर्तव्य आहे..

ज्या त्या हंगामात पिकांची केवळ पेरणी केली आणि झालं हे इथवरच मर्यादित नसतं. त्या सोबतच पेरणी करतांना लागणारी खतं, बियाणे, औषधं, करावी लागणारी मेहनत, त्यासाठी होणारा खर्च, या ही आर्थिक बाबींकडे पाहणे गरजेचं असतं. नुकसान केवळ पिकांचं होत नसून, सोबत शेतकऱ्यांचही आर्थिक नुकसान देखील होत असतं. निसर्गाच्या या अशा लहरींपणामुळे त्यांना उपासमार शिवाय आर्थिक अडचणींना देखील सामोरे जाण्याचं भयावह चित्र निर्माण झालं आहे. शिवाय शासनाच्या नियमांत कायम धरसोडपणाच्या लहरीपणाचा फटका देखील शेतकऱ्यांना बसत आहे. पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना काहीसा का होईना, थोडा फार तरी आधार असतो. परंतु शासनाच्या दर सालाला बदलणाऱ्या पीक विम्याच्या निकषांमुळे शेतकऱ्यांना आधार असणाऱ्या पीक विमेचा लाभ मिळण्याची शक्यतादेखील जवळपास मावळत चालली आहे.

अशावेळी पूरक पाऊस न होणे, दुसरीकडे वाढत जाणारा खर्च शिवाय पीक उत्पादनात होत जाणारी घट, यामुळे बळीराजाच्या हाताशी आलेला घास हिरावून जातो की काय ? अशी भयावह अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने या अशा निर्माण झालेल्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून, शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करून, त्यांना मानसिक तसेच आर्थिक पाठबळ देणं अत्यंत निर्णायक ठरणार आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या या एकूण अशा परिस्थितीचा अभ्यास करून, त्यांना विशेष आर्थिक जाहीर करावी, पिकांचे तातडीने पंचनामे करून घ्यावेत व पात्र ठरणाऱ्या शेतकरी बांधवांना, पीकविमा अंतर्गत तातडीने पीकविमा मंजूर करून त्यांना आर्थिक धीर देण्याची नितांत गरज आहे. शिवाय सद्यस्थितीत शासनाने शेतकरी राजाच्या तोंडाला पाने न पुसता, ठोस निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करून, या परिस्थितीतून बाहेर काढून त्यांना आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे.

Previous Post

ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

Next Post

साने गुरुजी विद्यालयात आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न……….

Related Posts

Blog

साने गुरुजी विद्यालयात आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न……….

August 30, 2026
0
ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*
Blog

ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

August 30, 2026
2
पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम
Blog

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026
13
Blog

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
53
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा
Blog

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026
345
गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.
Blog

गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.

August 29, 2026
21
Next Post

साने गुरुजी विद्यालयात आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न……….

ताज्या बातम्या

साने गुरुजी विद्यालयात आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न……….

August 30, 2026

पावसाच्या लहरीपणाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांना…

August 30, 2026
ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In