२१७२ सोमवार ३१ ऑगस २०२६
*मौलवी, नानक आणि*
*मोक्ष*
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला।ठायीच मुराला अनुभव।*
कापुराची वाती उजळली ज्योती।
ठायीच समाप्ति झाली जैशी।मोक्ष रेखे आला*
तो भाग्ये विनटला।
साधूचा अंकिता हरिभक्त।
ज्ञानदेवी गोडी संगति सज्जनी।
हरि दिसे जनी जनी आत्मतत्वी।
हरिपाठातील मागच्या अभंगाचा सार म्हणजे *परसेवा* कारण साधु याचा अर्थ *अधु माणसासह चालणारा* या अर्थाचा बोध म्हणजे साधुबोध. हा साधुबोध झाला म्हणजे देहबोध उरत नाही, असे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत.मात्र साधुपणाचा अहंकार उरला म्हणजे पुण्य संपले. कापसाची वात उजळते, जळते, संपते आणि दिसेनाशी होते.
“मी अशी सुंदर होते व जळत होते.”
हे सांगाण्यास ती वात उरत नाही. प्रकाशाचे लोलक अंधारामध्ये पसरत, ती ज्योत आपले दिव्य काम करते. नाहीशी होते. तिच्या त्यादिव्यतेच्या प्रकाशात घेतलेले ज्ञान, अंधारात सुध्दा कायम दिसते. असा हा प्रकाशाचा त्याग आहे.ज्ञानाचा चमत्कार आहे.
प्रकाश हा आपला त्याग सांगावयास शिल्लकच उरत नाही. परसेवेच्या अंकित असा तो हरिभक्त, मोक्षाच्या रेषेवर येऊन ठाकण्याचे भाग्य, त्या हरिभक्ताला सहजतेने लाभते. या अभंगाची तिसरी ओळ हे सांगते आणि ज्ञानदेवाला हरिरुप सर्वत्र दिसते आहे, असे हा अभंग साररुपाने सांगतो. हरि म्हणजे तृष्णा हरि.
या अभंगाचा संकेत, यज्ञ आणि यागाविरुध्द नाही, हे वर म्हटले आहे. यज्ञ आणि योग या मूळच्या चांगल्या साधनांवर जळमटं जमली होती. ती जळमटे म्हणजेच मूळ, असे समजणाऱ्याना ज्ञानेश्वर महाराजांनी इशारा दिला आहे.
गुरु नानकाची गोष्ट आहे, ते एका मशिदीत नमाज पढावयास गेले होते. एका मुसलमानाने मौलवी कडे तक्रार केली की नमाजपठणात गुरु नानकाचे लक्ष नव्हते. मौलवीने विचारले, तू हे कशावरून सांगतो आहेस तेव्हा तक्रारखोर म्हणाला की माझे नानकावर बारीक लक्ष होते. मौलवी म्हणाले, यांचा अर्थ तुझे स्वतः चे लक्ष नमाजावर नव्हते.
वरवर पाहाणाऱ्याला गतीतली शांती समजत नाही की शांतीतली गती समजत नाही.
स्वामी विज्ञानानंद
Manashakti Research Centre lonavala/9969083635.







