RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
लांजा : हर्दखळे ग्रामपंचायतीच्या विविध विषयांबाबत माहिती मिळविण्यासाठी जानेवारी २०२६ पासून माहितीच्या अधिकारांतर्गत (RTI) अर्ज करूनही अपेक्षित माहिती व उत्तरे मिळाली नसल्याची तक्रार किरण दत्ताराम चव्हाण यांनी आपले सरकार पोर्टलवर केली होती.
या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद रत्नागिरीच्या ग्रामपंचायत विभागाने पंचायत समिती लांजाच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित प्रकरणात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पत्रात, RTI अर्जांद्वारे मागविलेल्या माहितीला उत्तर न दिल्याबाबत संबंधित ग्रामसेविकेविtरुद्ध कार्यवाही करण्याची आवश्यकता नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान, तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल तक्रारदारास तसेच जिल्हा परिषद कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशामुळे हर्दखळे ग्रामपंचायतीतील RTI प्रकरणाला आता वरिष्ठ पातळीवरून अधिकृतपणे दखल मिळाली असून, ग्रामसेविकेविरुद्ध नेमकी कोणती कार्यवाही होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
“माहितीच्या अधिकाराचा वापर करून मागितलेली माहिती वेळेत मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. या प्रकरणात पारदर्शकपणे चौकशी होऊन योग्य कार्यवाही व्हावी,” अशी भूमिका तक्रारदार किरण दत्ताराम चव्हाण यांनी व्यक्त केली.








