पण पंधराशे रुपये साठी भलतेच नियम वारे लोहा कृषी विभाग ————————–लोहा :- लोहा कृषी विभाग अंतर्गत शेतकरी मित्र या पदासाठी लोहा तालुक्यातील सर्व सज्जामध्ये कृषी मित्र पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरुवात झालेले आहे तशाच पद्धतीने धावरी सज्जा साठीसर्वसाधारण पुरुषा साठी सुटलेला आहे या ठिकाणी अर्ज प्रक्रिया सुरुवात करण्यात आली आहे धावरी सज्जा तील धावडी रायवाडी किरोडा या गावात जाहीर प्रगटन नोटीस लावली गेलेली आहे पण धावरी रायवाडी किरोडा या ठिकाणी कृषी गटामार्फत प्रत्येक गावात दोन महिलाची निवड पाच हजार रुपये मानधन तत्वावर केलेली आहे याची जाहिरात किंवा नोटीस ग्रामपंचायतला लागलीच नाही किंवा गावाला कोणतीच माहिती न देता महिलाची निवड केलेली आहे ही निवड कशा पद्धतीने व कशाच्या आधारावर केलेली आहे असे सर्व जनतेचे मत आहे यामध्ये काही आर्थिक व्यवहार करून त्या महिला ची निवड केलेली आहे काय? असे बोलले जात आहे व यासाठी जबाबदार कोण याची सखोल चौकशी व्हावी व संबंधित जो कोणी असेल त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होते काय बघावं लागेल लोहा कृषी विभाग काय करतो ते असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.








