प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
परभणी दि. 28 /02/2025. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानामंधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब अन्न योजनेमधील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. शिधापत्रिकेमधील मयत, कायमस्वरूपी स्थलांतरीत, आधार प्रमाणित नसलेले दुबार लाभार्थी वगळण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांना अन्न धान्याचे वितरण व्हावे, यासाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणिकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जिवराज डापकर यांनी केले आहे.
आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी करण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजीत करण्यात येत आहेत. तसेच रास्तभाव दुकानस्तरावर देखील लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावायचे आहे. ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही अश्या लाभार्थ्याचे धान्य वितरण बंद होण्याची शक्यता असल्याने सर्व लाभार्थ्यांनी नजीकच्या रास्तभाव दुकानात जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जिवराज डापकर यांनी केले आहे.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
Discussion about this post