वार्ताहर : घनसावंगी दि.०५.०९.२०२४ गुरुवार रोजी सकाळी १० वाजता स्थळ संत रामदास कॉलेज ते तहसील कार्यालय घनसावंगी असे आयोजित करण्यात आला होता.
०१.०९.२०२४ ते०२.०९.२०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा ढगफुटी सद्रुश झालेल्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसगट अनुदान व 25% अग्रीम विमा मिळणे या प्रमुख मागन्यांची पूर्तता करणे बाबत. अतिवृष्टी मध्ये जे-जे जिल्ह्यातील मंडळ बसतात.त्या त्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान ( आर्थिक मदत म्हणून )देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
NDRच्या निकषानुसार जर ६५मी.मी इतका पाऊस झाला तर ते मंडळ अतिवृष्टीत बसले पाहिजे. शेतकऱ्याने आपल्या पिकाचा उतरवलेला विमा जिल्हाधिकारी साहेबाच्या आदेशाने अतिवृष्टी जाहीर करून २५% अग्रीम जिल्हाधिकारी बांधील आहे.
०१.०९.२०२४ ते०२.०९.२०२४ रोजी २०० मी.मी पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे तात्काळ जिह्यात अतिवृष्टी होऊन महापूर आल्याने नद्या, नाले फुटुन दोन्हीसाईडच्या जमिनी नापीक झालेल्या आहेत, त्या दुरुस्त करण्याकरिता मोफत पोकलेन , जेसीबी मशीन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्याव्यात.
तालुक्यातील शेकऱ्यांच्या वाहून गेलेल्या पाळीव प्राण्याची म्हणजेच गाय , म्हैस , बैल, शेळ्या , कोंबड्या व पिकांव्यातिरिक्त झालेल्या इतर साहीत्याच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी .
अशा प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन हे घनसावंगीच्या तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते (मार्फत ) देण्यात आले असुन त्या साठी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
वार्ताहार : सारथी महाराष्ट्राचा घनसावंगी तालुका प्रतिनिधी – कृष्णा बरसाले – ९७६५८७९६५६
Discussion about this post