गणेशोत्सव काळामध्ये तासगावच्या रथोत्सवाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. पेशवे काळातील सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी हा रथोत्सव सुरु केला. तामिळनाडू प्रांतातील श्रीरंगपट्टण येथील रथोत्सव पाहून सेनापती परशुरामभाऊ यांनी असा रथोत्सव तासगाव येथे सुरू करण्याचे ठरवले. तासगावचे गणेश मंदिर हे पेशवेकालीन स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना आहे. या मंदिरावर असलेले गोपुर तब्बल ९६ फूट उंच असून संपूर्ण महाराष्ट्रात असे उंच गोपुर दिसून येत नाही. चुना आणि शिसे यांचा वापर या गोपुरा च्या उभारणीमध्ये करण्यात आला आहे.
तब्बल दोनशे वर्षाहून अधिक काळ अखंडित पणे या रथोत्सवाची परंपरा कायम आहे. सांगली मिरज आणि कर्नाटकातील लाखो भाविक या रथोत्सवात सहभागी होत असतात. हा रथ परशुरामभाऊ नी खास बनवून घेतला आहे. या रथामध्ये पंचधातू ची श्री गणेश मूर्ती ठेवण्यात येते तर दोरखंडाने हा रथ भाविक ओढत असतात. मंदिरापासून गुरुवार पेठेतील कशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत हा रथोत्सव सोहळा होतो त्यानंतर रथ परतीच्या मार्गाला लागतो. पटवर्धन घराण्याची श्री गणेशावर निस्सीम भक्ती सर्वश्रुत आहे. सांगली. मिरज, हरिपूर. जमखंडी अशा विविध ठिकाणी पटवर्धन सरकार ने श्री गणेश मंदिरे उभी केली आहेत. आजचा रथोस्तव हा देखील तितकाच भव्य दिव्य होईल यात शंका नाही.
Discussion about this post