जि.प.उर्दू शाळेच्या रस्तावरील दोन्ही बाजुचे अतिक्रमण हटविणे तसेच पुलाचे काम होत नाही तो पर्यंत एक ही विद्यार्थी शाळेत जाणार नाही..
पालकासह नागरीकांचा गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला इशारा..
धाड : जो पर्यंत धाड येथील जि.प.उर्दू शाळेच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण हटविण्यात येत नाही तसेच मिर्झा गल्ली ते जामठी रोडवर पुल होत नाही.
तो पर्यंत शाळेत धाड येथील उर्दू शाळेत एक ही विद्यार्थी शाळेत जाणार नाही अशा प्रकारची मागणी धाड येथील पालक व गावकऱ्यांनी अशा प्रकारची मागणी बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला दि.१० सप्टेंबरला केली आहे.
धाड येथील पालक व गावकऱ्यांनी संबंधित निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे अशी मागणी केली आहे की उर्दू शाळेतील रस्ताच्या दोन्ही बाजुला काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.
याच कारणामुळे रस्ता कमी होत चालले आहे. ह्यामुळेच रस्तावर अपघात होत आहे. मंगळवारी इयत्ता दुसऱ्या वर्गाची विद्यार्थीनी कु.माहेरा इरम मो.अल्ताफ हया विद्यार्थीनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
एखादया वेळी मोठा अपघात होऊन जीवीतहानी ही होऊ शकते. धाड येथुन जवळपास पंधराशे विद्यार्थी उर्दू शाळेत ये-जा करतात.तसेच विद्यार्थींनां एकाच पुलावरुन येणेजाणे करावे लागते हयाच पुलावरुन रेतीचे टिप्पर, बस,दुचाकी वाहनांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते विद्यार्थीनसह नागरीकांना जीवमुठीत घेऊन यावे जावे लागते त्यासाठी मिर्झा नगर ते जामठी रोडवर एका नविन पुल तयार करण्यात यावे जणे करुन विद्यार्थ्यानसाठी सोयीचे होईल.
हा विषय वेळोवळी आपल्याकडे तसेच जि.प.बांधकाम विभागाकडे सातत्याने मागणी केली आहे. अधापही आपण हया प्रकाराकडे दूर्लक्ष केले आहे. म्हणुन जो पर्यंत उर्दू जि.प.शाळेवरील रस्ताच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण हटविण्यात येत नाही तसेच मिर्झा नगर ते जामठी रोडवर पुलाचे काम होत नाही.
तो पर्यंत विद्यार्थी शाळेत जाणार नाही. अशे टोकाचे पाऊल पालकासह नागरीकांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केला आहे.
येत्या तीन दिवसात संबंधित विभागाने मागण्या नाही मानल्यास पंचायत समिती व बांधकाम विभागासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाचा इशारा केला आहे.
संबंधित निवेदनावर शाळा समितीचे अध्यक्ष मो.जुबेर,उपाध्यक्ष सलमान बुढण खान,मो.रिझवान सौदागर ,निसार चौधरी,मो.शकील,फहीम कुरेशीसह अनेक पालकासह नागरीकांचा सहया आहे.
Discussion about this post