• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापूर–रत्नागिरी प्रवासाला वेग; आंबा घाटात उभारला जाणार नवा भुयारी मार्ग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

बांबवडे | प्रतिनिधी :
कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी आंबा घाटात नवीन भुयारी मार्ग (टनल) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबत माहिती दिली.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

आंबा घाटातील वाहतूक कोंडीला दिलासा

सध्या आंबा घाटातील डोंगराळ आणि वळणावळणाच्या मार्गामुळे वाहनांचा वेग कमी होतो आणि अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. प्रस्तावित भुयारी मार्गामुळे कोल्हापूर–रत्नागिरी प्रवासाचा कालावधी कमी होण्यासह प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई–गोवा महामार्गावरील टोलबाबतही चर्चा

बैठकीत मुंबई–गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्वसामान्य वाहनचालकांना दिलासा मिळावा यासाठी या महामार्गावरील टोलदर कमी करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

कोकणातील रस्ते विकासाला गती

यावेळी कोकणातील विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांवरही चर्चा झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी–जयगड, जयगड–गुहागर आणि चिपळूण–सातारा मार्गांच्या विकासासाठी नवीन आराखडे (डिझाईन्स) तयार करण्यात येणार आहेत.

याशिवाय लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली आणि मंडणगड मतदारसंघांतील विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण अधिक गतिमान होऊन व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

शाहूवाडी-पन्हाळावासीय सेवा संघातर्फे १५० गुणवंतांचा गौरव; अविनाश पाटील यांना ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न’ पुरस्कार

Next Post

वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
20
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
15
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
28
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
24
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त

वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In