• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एनसीएमसी कार्ड अंमलबजावणीस मुदतवाढ द्यावी; पत्रकार भारत कवितके यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

मुंबई (कांदिवली पश्चिम) | प्रतिनिधी

RelatedPosts

‘झाडांची भिशी’ उपक्रमांतर्गत १५० हून अधिक वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जिल्ह्यात पावसाने घेतली विश्रांती; कृष्णा नदीची पाणीपातळी घटली, जनजीवनाला दिलासा

धाराशिव जिल्हा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी दीपक घोडके यांची निवड

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून १ ऑगस्ट २०२६ पासून एनसीएमसी (NCMC) कार्डची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मात्र, कार्ड काढताना प्रवाशांना येणाऱ्या विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणी लक्षात घेता या निर्णयास आणखी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पत्रकार, साहित्यिक, गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केली आहे.

भारत कवितके यांनी सांगितले की, एनसीएमसी कार्ड नोंदणी प्रक्रियेदरम्यान सर्व्हर डाऊन होणे, मोबाईलवर ओटीपी वेळेत न मिळणे, बायोमेट्रिक पडताळणीमध्ये अडचणी येणे, तसेच मिळणाऱ्या पावतीवरील मजकूर अस्पष्ट असल्याने कार्ड मिळवताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय अनेक बसस्थानकांवर पुरेशी शेड, बसण्याची व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा नसल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हात व पावसात तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मोबाईल नसलेले किंवा डिजिटल प्रक्रियेची माहिती नसलेले नागरिक विशेषतः ज्येष्ठ महिला आणि अशिक्षित प्रवासी या प्रक्रियेमुळे अधिक त्रस्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या संदर्भात रांगेत उभ्या असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांशी संवाद साधला असता, त्यांनी आधार कार्ड हे शासनमान्य ओळखपत्र असताना अतिरिक्त प्रक्रियेमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच बसस्थानकांवरील शेड, पंखे, स्वच्छतागृहे, सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

एनसीएमसी कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करून कार्ड पोस्टाद्वारे घरपोच उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी तसेच १ ऑगस्टची अंतिम मुदत वाढवून नागरिकांना पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी भारत कवितके यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे केली आहे.

Previous Post

पिरंगुट परिसरातील वारंवार वीजपुरवठा खंडित; जनरेटरसाठी डिझेल उपलब्धतेची तहसीलदारांकडे मागणी

Next Post

आषाढी वारी निमित्त पिंपोडे सायकल क्लबची पंढरपूरकडे सायकल वारी

Related Posts

Blog

‘झाडांची भिशी’ उपक्रमांतर्गत १५० हून अधिक वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

July 11, 2026
0
Blog

जिल्ह्यात पावसाने घेतली विश्रांती; कृष्णा नदीची पाणीपातळी घटली, जनजीवनाला दिलासा

July 11, 2026
2
Blog

धाराशिव जिल्हा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी दीपक घोडके यांची निवड

July 11, 2026
6
Blog

आषाढी वारी निमित्त पिंपोडे सायकल क्लबची पंढरपूरकडे सायकल वारी

July 11, 2026
18
Blog

पिरंगुट परिसरातील वारंवार वीजपुरवठा खंडित; जनरेटरसाठी डिझेल उपलब्धतेची तहसीलदारांकडे मागणी

July 11, 2026
5
Blog

समाधानकारक पावसाने गुंडेगाव परिसरात खरीप पेरणीला वेग; कृषी सेवा केंद्रांवर बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी

July 11, 2026
4
Next Post

आषाढी वारी निमित्त पिंपोडे सायकल क्लबची पंढरपूरकडे सायकल वारी

ताज्या बातम्या

‘झाडांची भिशी’ उपक्रमांतर्गत १५० हून अधिक वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

July 11, 2026

जिल्ह्यात पावसाने घेतली विश्रांती; कृष्णा नदीची पाणीपातळी घटली, जनजीवनाला दिलासा

July 11, 2026

धाराशिव जिल्हा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी दीपक घोडके यांची निवड

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In