• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेरणीनंतर पावसाने दिली दडी; उगवलेली पिके वाढ खुंटल्याने शेतकरी चिंतेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

RelatedPosts

जय हिंद करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल; फलटण परिसरात आनंदाचे वातावरण

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

डोंगरगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण

पेरणीनंतर पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. पिकांची उगवण झाली असली तरी पुरेशा पावसाअभावी वाढ खुंटली असून, दिवसभर कडक उन्हामुळे पिके करपू लागल्याची परिस्थिती अनेक भागांत निर्माण झाली आहे.

पेरणीयोग्य पाऊस पुरेसा नसतानाही शेतकऱ्यांनी धाडस करत खरीप पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

११ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ६ लाख २८ हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी केवळ २ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली होती. म्हणजेच निम्म्याहून कमी क्षेत्रावर पेरणी झाली असून, उर्वरित क्षेत्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून उगवलेली पिके धोक्यात आली आहेत. वेळेत चांगला पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट आणि मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

सध्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून, लवकरात लवकर मान्सून सक्रिय होऊन समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप; उंबरवाडीत अभ्यासिका सुरू करण्याची घोषणा

Next Post

‘पंढरीची वारी… मानवतेची शाळा’; वारीतून माणुसकीचा घेतलेला अनुभव

Related Posts

Blog

जय हिंद करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल; फलटण परिसरात आनंदाचे वातावरण

August 27, 2026
19
Blog

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 27, 2026
5
Blog

डोंगरगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण

August 27, 2026
5
Blog

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

August 27, 2026
9
Blog

फलटण-सासकल एसटी सेवा सहा वर्षांपासून बंद; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

August 27, 2026
8
Blog

रिसोडच्या आडोळ धरणाची पाणीपातळी खालावली; पाणीटंचाईचा धोका

August 27, 2026
3
Next Post

'पंढरीची वारी... मानवतेची शाळा'; वारीतून माणुसकीचा घेतलेला अनुभव

ताज्या बातम्या

जय हिंद करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल; फलटण परिसरात आनंदाचे वातावरण

August 27, 2026

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 27, 2026

डोंगरगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण

August 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In