
पातूर | प्रतिनिधी
आदर्श गोसेवा संस्थेचे अध्यक्ष तथा नूतन विद्यालय, आलेगावचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या पुढाकारातून पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, या उद्देशाने शालेय बॅगचे वितरण करण्यात आले.
यावेळी उंबरवाडी गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. लवकरच गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका सुरू करण्यात येणार असून, आलेगाव येथे शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींप्रमाणेच मुलांनाही नियमित बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती निलेश कापकर यांनी दिली.
यावेळी उपस्थितांनी आदरणीय सुभाष काका जैन यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. त्यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभावे आणि समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू राहावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
प्रमुख उपस्थिती :
निलेश तोताराम कापकर (सामाजिक कार्यकर्ते), नितीन आनंदा ढोणे, बंडू डाखोरे (उपसरपंच), दीपक डुकरे, मदन शिंदे, समाधान गाढवे, केशव डाखोरे, सुकराज डाखोरे, प्रदीप ताजने, विठ्ठल डाखोरे, राजू देवकर, दीपक धंदेरे, अरुण झाटे, सुरेश लठाड, रामदास ठाकरे, परशराम तिवाले आणि सुकनंदन डाखोरे उपस्थित होते.
🟦 चौकट
“शिक्षणाचा दीप प्रत्येक घरात प्रज्वलित झाला, तरच समाजाचा खरा विकास होईल.”
— निलेश तोताराम कापकर, सामाजिक कार्यकर्ते

