• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीला ट्रकची धडक; सांगलीतील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, सात जण जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

सांगली | प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज

RelatedPosts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

आषाढी वारीदरम्यान सोमवारी (१३ जुलै) सकाळी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळील बेलसर फाटा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीला ट्रकची धडक बसून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा मार्गस्थ असताना नांदेडच्या दिंडीचा ट्रक सांगली जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जेजुरी येथील आनंदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृत वारकरी

  • नंदा बाबुराव पवार (वय ६०), रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली
  • माधवी राजाराम सलगरे (वय ५५), रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली
  • राजश्री शंकर भोसले (वय ५५), रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली

जखमी वारकरी

  • शांता शिवाप्पा अलकोपर (वय ७०), रा. मिरजवाडी, ता. मिरज
  • कासाबाई जगन्नाथ गस्ते (वय ७०), रा. आष्टा, ता. वाळवा
  • लक्ष्मी विठ्ठल गडदे (वय ४५), रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ
  • अक्काताई बबन कोळी (वय ६०), रा. शिरगाव, ता. तासगाव
  • शैलजा दिनकर जगताप (वय ५८), रा. कवलापूर, ता. मिरज
  • गीताबाई सदाशिव हंकारे (वय ६५), रा. कसबे डिग्रज, ता. मिरज
  • मंगल विलास पाटील (वय ६५), रा. कवलापूर, ता. मिरज

या दुर्घटनेनंतर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वारकऱ्यांच्या दिंड्या आणि वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था असती, तर अशी दुर्घटना टाळता आली असती, असे त्यांनी सांगितले. पुढील काळात पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करण्याची मागणीही त्यांनी केली.

‘विठ्ठल रखुमाई’ योजनेची माहिती

राज्य शासनाच्या ‘विठ्ठल रखुमाई’ योजनेनुसार वारीच्या कालावधीत अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना पायी किंवा वाहनाने पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना लागू असून, लाभासाठी पंढरपूर यात्रेबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

Previous Post

पाटणबोरीतील रस्ता बांधकाम संथगतीने; नागरिकांचा संताप, तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी

Next Post

पीएमजीपी वसाहत तळीराम व अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा अड्डा बनल्याचा नागरिकांचा आरोप; कारवाईची मागणी

Related Posts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम
Blog

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026
13
Blog

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
40
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा
Blog

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026
288
गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.
Blog

गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.

August 29, 2026
18
Blog

नगर पंचायतच्या अर्धवट कामा मुळे नागरिकात नाराजी………………………..

August 29, 2026
13
मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद
Blog

मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

August 29, 2026
13
Next Post

पीएमजीपी वसाहत तळीराम व अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा अड्डा बनल्याचा नागरिकांचा आरोप; कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In