
शिरूर | पुणे प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप गटनेते नितीनदादा पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध विकासकामांना गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे नगरसेवक सागर नरवडे आणि नगरसेविका पूजाताई पोटावळे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देत अल्पावधीत अनेक विकासकामे पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला आहे.
नगरसेवक सागर नरवडे यांनी सांगितले की, नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचे नेतृत्व आणि गटनेते नितीनदादा पाचर्णे यांचे मार्गदर्शन यामुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळाली असून नागरिकांनी दाखविलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रत्येक समस्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नगरसेविका पूजाताई पोटावळे यांनीही नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेणे आणि त्या तातडीने मार्गी लावणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगितले.
गेल्या सहा महिन्यांत प्रभागात पावसामुळे पडलेले खड्डे बुजविणे, चेंबर दुरुस्ती व बांधकाम, चिखलमय रस्त्यांवर मुरूम टाकणे, नवीन स्ट्रीटलाईट बसविणे, बंद दिव्यांची दुरुस्ती, स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा, गटारींची देखभाल तसेच इतर सार्वजनिक सुविधांशी संबंधित कामांना प्राधान्य देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तक्रार प्राप्त होताच संबंधित ठिकाणी भेट देऊन कामांचा पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यशवंत कॉलनी, सैनिक सोसायटी, जिजामाता हाउसिंग सोसायटी, शिवाजी हाउसिंग सोसायटी, करंजुले वस्ती, कुकडी कॉलनी आदी भागांमध्ये नियमित भेटी देऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पावसाळ्यानंतर आवश्यक ठिकाणी दर्जेदार सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार असून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी माहिती सागर नरवडे यांनी दिली.
नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांचे नेतृत्व, गटनेते नितीनदादा पाचर्णे यांचे मार्गदर्शन तसेच नगरसेवक सागर नरवडे आणि नगरसेविका पूजाताई पोटावळे यांच्या कार्यामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये विकासकामांना गती मिळाल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
