बांबरुड (राणीचे), ता. पाचोरा बांबरुड राणीचे येथील तीन बर्डी शिवारातील शेतात बांधलेल्या गुरांवर रात्री वाघाने हल्ला करुन गाईला ठार करायची घटना घडल्याने त्या शेती शिवारात पशुपालकांमध्ये घबराट निर्माण झाले आहे. येथील शेतकरी सुधाकर रामचंद्र शिर्के यांचे तीन बर्डी शिवारातील शेतात बांधलेल्या गुरांवर रात्री वाघाने हल्ला करुन एका गाईचा खात्मा केला. रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सदर शेतकरी शेतात गेला असता गाय फाडलेल्या अवस्थेत दिसून आली. तत्काळ शेतकऱ्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सदर घटनेची माहिती देऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्याचे ३० ते ४० हजाराचे नुकसान झाले. वन विभागाने तात्काळ दखल घेऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पशुपालकांमध्ये करण्यात येत आहे






