भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
मुंबई कांदिवली येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता निवड झाली असल्याचे दैनिक झुंजार केसरी चे मुख्य संपादक मुनीर खान यांनी भारत कवितके यांना कळविले आहे, रविवार दिनांक २३ आगस्ट २०२६ रोजी सकाळी ११वाजता आंबेडकर भवन सभागृह ,दिपक हाॅस्पिटल शेजारी, जालना या ठिकाणी दैनिक झुंजार केसरी च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रमात भारत कवितके यांना त्यांच्या गीतकार या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
भारत कवितके यांची २४ गाणी युट्यूबवर प्रसारित होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत,तर त्यांची आता पर्यंत १० पुस्तके प्रकाशित झाली आहेत,आठ पुस्तकांना राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत, अकराव्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा लवकरच संपन्न होणार आहे.भारत कवितके यांच्या पुरस्कारांची संख्या आता पर्यंत ११७३ झाली आहे, महाराष्ट्र राज्य आणि गोवा, दिल्ली, ओरिसा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांतून पत्रकारिता, साहित्य, सामाजिक क्षेत्र, गीत लेखन, आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारत कवितके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.महाराष्ट्र राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या लेख कविता कथा चारोळ्या सातत्याने प्रसिद्ध होत असतात, सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे,
दैनिक झुंजार केसरी च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून जालना चे पालकमंत्री पंकजा ताई मुंडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार हिकमत उढाण, आमदार कैलासजी गोरट्याल, जिल्हाधिकारी जालना श्रीमती आशिमा मित्तल, महापौर वंदना अरुण मगरे, पोलीस अधीक्षक जालना तेजबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी साहेब, नगराध्यक्ष प्रियांका राक्षे,डी.वाय.एस.पी.रामेश्वर रेगे पाटील, नगरसेवक इजरान कुरेश, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य संपादक मुनीर खान , स्वागताध्यक्ष संपादक दैनिक झुंजार केसरी अकबर अली सय्यद, संपादक अंकूश कापकर, उपसंपादक दिपाली सय्यद, उपसंपादक नय्युम शेख, असणार आहेत, तर आयोजक पत्रकार संतराम जाधव व शिवाभाऊ बोबडे हे आहेत.भारत कवितके यांना जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ जाहीर झाल्याने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचेवर अभिवादनाचा वर्षाव करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








