
करमाळा | प्रतिनिधी :
जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत गणेशोत्सव कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे, उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे, कार्याध्यक्षपदी अशोक चव्हाण, खजिनदारपदी अल्ताफ शेठ तांबोळी तर मिरवणूक प्रमुखपदी नितीन घोलप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

गणेशोत्सव उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने तसेच सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यासाठी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी मंडळाचे मार्गदर्शक कमलाकर वीर, प्रवीण कटारिया तसेच मंडळाचे सदस्य रणजीत ढाणे, अतुल बनसुडे, अनिल पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, दिनेश भांडवलकर, संतोष जाधव पाटील, प्रमोद चांदगुडे, संजय शिंदे (नेते), पिंटूशेठ गुगळे, सुदेश भंडारे, सुनील जाधव, सुदाम शेठ लेंडवे, पटेल, तरुण पटेल, लालूमिया कुरेशी, इसाक दारुवाले, तुळशीराम दुधाट, सुनील बनसुडे, पांडुरंग वडे, पांडुरंग जाधव, जितेंद्र चांदगुडे, सागर वडे, सुधीर कटारिया, सतीश थोरबोले, सुखदेव लष्कर, अविनाश जोशी, सुजित रासकर, चंद्रकांत पाटील, इनुस मनेरी, राहुल परदेशी, दादा मिर्जा, मनोज पवार, संतोष गानबोटे, शहापुरे गुरुजी, गुरव गुरुजी, अभय शेंडगे, निलेश बोरा, जाफर घोडके आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. आगामी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव अधिक उत्साहपूर्ण व समाजोपयोगी करण्याचा निर्धार मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
