श्रीरामपूर (प्रतिनिधी) : खरीप २०२५ मधील कपाशी, तूर पिकविमा तसेच रब्बी हंगामातील गहू पिकाची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या बाबत १९ ऑगस्ट रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत तालुका कृषी अधिकारी राक्षे, कदम तसेच पटारे आणि पिकविमा कंपनी प्रतिनिधी यांच्यासह शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीसाठी अशोक कारखान्याचे संचालक विदेश गलांडे, शेतकरी संघटनेचे सागर गिऱ्हे , संतोष नाईक, दिलीप गलांडे, गणेश ताके, हरीभाऊ लांडे, गोकुळ भालदंड, विशाल चोरमल, गोकुळ घोडे आदी उपस्थित होते.







