मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे.. 🖊️ सारथी महाराष्ट्राचा न्यूज…… स्थानिक मारेगाव शहरात असलेल्या महामार्गावर मार्डी चौक, आंबेडकर चौक. येथे सतत होत असलेल्या वाहतुकीच्या वरदळीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील आजूबाजूंच्या 108 गावांमधून विद्यार्थी वृद्ध तसेच शासकीय कागदपत्राच्या कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक मारेगाव मध्ये येत असतात. मारेगाव शहरात रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो, परिसरात लहान-मोठे अपघात होतात नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर मार्डी चौक तथा आंबेडकर चौक, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सिग्नल लाईट, दोन ट्राफिक हवालदारांची कायमी नियुक्ती करणे गरजेचे आहे, या संदर्भात बहुउद्देशीय संस्था मारेगाव, यांचे अध्यक्ष तथा प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखले जाणारे अजय सदाशिव रायपुरे. यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस. यांच्याकडे यवतमाळ जिल्हा अधीक्षक, यांच्यामार्फत विनंती अर्ज सादर केले आहे यापूर्वीही यासंदर्भात दोनदा विनंती अर्ज सादर केल्याबाबत नमूद केले आहे प्रशासनाने गांभीर्याने या समस्येकडे लक्ष देऊन दोन्ही चौकात सिग्नल लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे, तथा हवालदारांची कायमी युक्ती करून नागरिकांचे समाधान करावे अशी सर्वत्र मागणी होत आहे.








