मा.आमदार विरेंद्र जगताप यांचे नेतृत्व
चांदूर रेल्वे : उड्डाणपूल सुरू होऊन दोन वर्षे उलटली असून या मार्गावरून एस.टी. बससेवाही सुरू आहे. मात्र, एस.टी. महामंडळाकडून अद्याप जुन्या लांब मार्गानुसार तिकीटदर आकारले जात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पालक, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने चांदूर रेल्वे एस.टी. डेपो व्यवस्थापकांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले. चांदूर रेल्वे ते सोनगाव, कळमगाव, कळमजापूर, बग्गी, जवळा निंभा आणि राजुरा या मार्गांवरील तिकीट व पासचे दर तातडीने कमी करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांकडून अतिरिक्त आकारण्यात आलेली रक्कम त्यांना परत करावी, अशी मागणीही आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी केली. प्रवाशांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून एस.टी. महामंडळाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापकांनी या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप यांची उपस्थिती होती. विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, पालक, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
याशिवाय, चांदूर रेल्वे एस.टी. डेपो परिसरातील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी तसेच प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली. प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणारी वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही एस.टी. महामंडळाची जबाबदारी असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. यावेळी भाऊंसोबत असंख्य विद्यार्थी व काँग्रेसचे कार्यकर्ते रुपेश पुडके, शेट्टुदादा सूर्यवंशी,स्वप्निल मानकर, प्रफुल कोकाटे, सारंग देशमुख,अरविंद गुरुदे,अभिजीत देशमुख, अनंत पोलाद, आर्यन वानखडे, रुपेश बनसोड, दत्तात्रय भागवत, प्रवीण चींचे, आदीमनी बोधिले, राजेश बनसोड, संयोग ठाकरे, जीवन आगाशे, प्रतीक भैसे, सौरभ गावंडे, भावना बाणेकर, पायल कांबळे, आचल शेंडे, चैताली चौधरी, अस्मिता बेले, परी गोल्हे, सिद्धी बोडकुठे, रिया रंगारी, मंजुषा शेंडे, प्रणिता सहारे, कशिष पोहेकर, ऋतुजा कावरे, संजय राव गावंडे, हनुमान जी मोडक, वैभव चुकेकर, प्रमोद सोनवणे, राहुल राऊत, अथर्व वनवे, प्रफुल माईंदे, अर्पित चौधरी, सराड दादा, दिनेश चौकडे, शंतनु राऊत, प्रणव इंगळे, असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.








