चिखली जितु निकाळजे
दि. 27-8-26रोजी साकेगांव येथील सम्राट अशोक बुध्द विहार येथे सोमनाथ तायडे (पाटील )यांच्याकडून संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका यांना खीरदान वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरवात सामूहिक बुद्ध वंदना पंचशीलेणे करण्यात आले वर्षावासात पौर्णिमेच्या दानाचे महत्त्व
बौद्ध धम्मात वर्षावास हा अतिशय पवित्र काळ मानला जातो. आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत ३ महिने भिक्खू एका विहारात राहून धम्म साधना करतात.
या काळात पौर्णिमेला केलेले दान हे महापुण्याचे मानले जाते.
वर्षावास म्हणजे काय
भगवान बुद्धांच्या काळापासून पावसाळ्यात भिक्खूंच्या पायाखाली लहान जीव-जंतू मरू नये म्हणून एकाच ठिकाणी राहण्याची परंपरा आहे. यालाच वर्षावास म्हणतात.
पौर्णिमेला दान का महत्त्वाचे
पुण्य संचय या काळात भिक्खू शील, समाधी, प्रज्ञेचे पालन करतात. अशा शीलवान भिक्खूला दिलेले दान हे हजार पटीने फळ देते.
त्रिविध पौर्णिमा वर्षावासात ४ पौर्णिमा येतात – आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन. प्रत्येक पौर्णिमा बुद्ध जीवनातील घटनेशी जोडलेली आहे. त्यामुळे दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कठीण चीवर दान अश्विन पौर्णिमेला वर्षावास संपतो. या दिवशी दिलेले चीवर दान हे सर्वात मोठे दान मानले जाते.
जीवनातील दुःखातून मुक्ती धम्मात सांगितले आहे दानं ददन्तु सद्धाय, सीलं रक्खन्तु सब्बदा
श्रद्धेने दान दिल्याने लोभ कमी होतो, मन शुद्ध होते.
काय दान करावे
पौर्णिमेला अष्टशील घेणे, भिक्खूंना भोजन (पिंडपात), चीवर, औषधी, पुस्तके, दिवाबत्ती, फळे-फुले यांचे दान करता येते.
वर्षावासातील पौर्णिमा ही शेतकऱ्याने पेरलेल्या बियाण्यासारखी आहे. एका दानाचे पुण्य अनेक जन्मांपर्यंत सोबत राहते.या खीर दान कार्यक्रमाला कुशीवर्ता निकाळजे विमल निकाळजे लक्ष्मी निकाळजे कौशल्या निकाळजे संगीता निकाळजे शोभा पवार सविता म्हस्के रमाबाई वानखेडे जिजाबाई जाधव अंतःकला निकाळजे भारत घेवंदे प्रकाश निकाळजे रंगनाथ निकाळजे केशव निकाळजे विष्णू निकाळजे आस्रुबा निकाळजे किशोर निकाळजे आलम खान हुसेन खान सचिन इंगळे आकाश इंगळे शुभम तायडे सचिन लोखण्डे अरविंद इंगळे (पाटील ) व समस्त समाज बांधव गावकरी मंडळी उपस्थितीत होते या कार्यक्रमासाठी जितु निकाळजे अशोक निकाळजे अनिल निकाळजे समाधान निकाळजे व ग्रंथ श्रवणासाठी येणाऱ्या महिलांना मंडळ यांनी परिश्रम घेतले.








