शेतकरी व सैनिकांच्या विविध प्रश्नांवर मनोजकुमार डांगे सर व निलेश निकम सर यांनी मांडली भूमिका
प्रदीप ताजने
पातुर प्रतिनिधी : सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. मनोजकुमार डांगे सर तसेच उपाध्यक्ष श्री. निलेश निकम सर यांची दिं २७ ऑगस्ट रोजी TV9 मराठी या वृत्तवाहिनीवर विशेष मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत त्यांनी सैनिक, शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर भूमिका मांडली.
सैनिक आणि शेतकरी हे देशाच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून त्यांच्या प्रश्नांकडे शासन आणि समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे डांगे यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या अडचणी, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध प्रश्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
उपाध्यक्ष निलेश निकम सर यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती देताना समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सैनिक व शेतकरी यांच्या हितासाठी जनजागृती, मार्गदर्शन आणि शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी फाउंडेशन सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
TV9 वरील या मुलाखतीमुळे सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला व्यापक व्यासपीठ मिळाले असून, फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती राज्यभरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. मुलाखतीचे नागरिक, शेतकरी आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे .असे सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशन चे पातूर तालुका अध्यक्ष रविकुमार रमेश तायडे यांनी कळविले आहे.







