महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक नगरमध्ये 80 टक्के बीडमध्ये.86%. तूट. मुंबई…
राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले असून. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश जिल्हामध्ये.50%. पेक्षा अधिक पावसाची तूट नोंदवली गेली आहे. अहमदनगर मध्ये 80 टक्के तर बीडमध्ये 86 टक्के पावसाची घट झाली आहे. नाशिक आणि कोल्हापूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे.
हवामान तज्ज्ञ एस बी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असले तरी त्याचा महाराष्ट्रावर.फारसा परिणाम होणार नाही. भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यातही राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. अल निनो सक्रिय असल्यामुळे पावसाचे वितरण असमान राहिले आहे. जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र संपूर्ण राज्यात पावसाची.46% पर्यंत तूट दिसून आली आहे. मुसळधार पावसाची शक्यता सध्या तरी नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सर्वात आधी……
परभणी नगरी न्युज…….








