विरपक्षी मैंदर्गी – अक्कलकोट तालुका प्रतिनिधी
तालुक्यात यंदा पावसाने फिरवल्याने खरीप पिकापाठोपाठ ऊस पिकालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून अपेक्षित पाऊस न झाल्याने ऊसाची वाढ खुंटली आहे. समाधानकारक पाऊस पडले नसल्यामुळे ऊस उप्तादक शेतकरी चिंतेत अडकली आहे. तालुक्यातील तडवळ खानापूर चुंगी शिरवळ अंकलगे कोर्सेगाव कुमठे चिंचोळी नजीक आदि सीना भीमा बोरी नदीकाठाच्या भागात ऊसाची पावसा अभावी अपेक्षित वाढ झालेली नाही. महागडी खते, मशागत, औषध साठी झालेला खर्च वसूल होईल कि नाही या बाबत शेतकरी चिंतेत आहे.
‘’ यंदा पावसाची कमतरता अधिक आहे, पुरेशा प्रमाणात ऊसाची वाढ झालेली नाही. महागडी खते आणि मशागतीचा खर्च निघेल कि नाही याची चिंता आहे. शेती व्यवसाय आता बेभरवशाच झाला आहे.” धानप्पा मातनळी – ऊस उत्पादक शेतकरी चिंचोळी ( नजीक ) तालुका अक्कलकोट.










