वंधली (प्रतिनिधी):
साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन सण अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. याप्रसंगी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रविण मा. बरबटकर यांनी रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आणि बहीण-भावाच्या पवित्र नात्याची थोरवी विद्यार्थ्यांना पटवून दिली. केवळ स्वतःच्या बहिणीचेच नव्हे, तर समाजातील प्रत्येक महिला व मुलीचे रक्षण करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या वर्गमित्र आणि बांधवांना ओवाळून त्यांच्या मनगटावर आकर्षक राखी बांधली. विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या भगिनींना रक्षणाचे वचन दिले. याप्रसंगी संपूर्ण विद्यालयात सलोख्याचे आणि कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते. तसेच झाडांना सुध्दा राखी बांधुन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयातील शिक्षक श्री. प्रमोद पाटील , मुकेश वाटेवार , कु. बरडे मॅडम, श्री. प्रशांत खापणे, श्री. गोपाल पायघन, श्री. किशोर विधाते, श्री. गणेश वासाडे आणि श्री. प्रशांत कालर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. मधुर मिठाई वाटपाने या सुंदर सोहळ्याची सांगता करण्यात आली.




