भारत कवितके मुंबई कांदिवली
मुंबई कांदिवली येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास राज्य स्तरीय महात्मा गांधी साहित्य पुरस्कार २०२६ नुकताच जाहीर झाला असून त्याबाबत के.एस.आय.पब्लिकेशन आयोजित ३१वे साहित्य संमेलन , कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते भारत कवितके यांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे साहित्य संमेलनाचे आयोजक विलास पाटील कवी इंगळी सरकार यांनी भारत कवितके यांना निवड पत्र देऊन कळविले आहे.
रविवार दिनांक ४ आक्टोंबर २०२६ रोजी सकाळी ११वाजता कोल्हापूर येथे साहित्य संमेलनात कवी संमेलन, कथा कथन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पुरस्कार, पुस्तक प्रकाशन सोहळा असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत, पुरस्कार जाहीर होताच भारत कवितके यांनी प्रतिक्रिया दिली की,” २ आक्टोंबर २०२६ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मला हा पुरस्कार मिळणार आहे,यांचा मला खरोखरच खूप अभिमान वाटतो आहे, पुरस्कार ही एक वाढती जबाबदारी म्हणून मी पाहतो आहे, पुरस्कारामुळे प्रेरणा, प्रोत्साहन मिळते, आपल्या कार्याची समाजात कोणी तरी दखल घेत आहे,ही सुखद भावना मनात जागृत होते, त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो,” भारत कवितके यांचे आयुष्य उसवताना हे आत्मचरित्र म्हणजे भारत कवितके यांनी संघर्षाकडून यशाकडे केलेली वाटचाल होय, गरिबी, उपासमार, वेदना यातून लिखाणाची सुरुवात भारत कवितके यांनी केली आहे, यातील काही प्रसंग वाचून डोळ्यातून अश्रू ओघळल्याशिवाय राहत नाहीत,इतके संघर्ष मय आयुष्य लेखक जगला यावर लवकर विश्वास बसत नाही.भारत कवितके यांचे आयुष्य उसवताना हे आत्मचरित्र नक्कीच वाचा, भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास हा चौथा राज्य स्तरीय पुरस्कार मिळतो आहे, भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास पुरस्कार जाहीर होताच समाजाच्या विविध थरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.











