• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; संभाजी ब्रिगेडची सरकारकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

शेतकऱ्यांना हेक्टरी ८० हजार रुपये अनुदानासह विविध मागण्यांसाठी उदगीर तहसीलदारांना निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

लातूर :

RelatedPosts

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

मालेगाव शहरात वारंवार वीज खंडित; नागरिक त्रस्त

संपूर्ण मराठवाड्यात पावसातील अनिश्चितता व शेतीसमोरील संकटाची दखल घेऊन मराठवाडा कोरड्या दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या लातूर जिल्हा व तालुका कार्यकारिणी तसेच शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी उदगीर तहसीलदारांमार्फत राज्याचे कृषिमंत्री तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक व प्रशासकीय मदत देण्याच्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

१. संपूर्ण मराठवाडा कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा.
२. बियाणे, खते व फवारणीसाठी झालेल्या खर्चापोटी हेक्टरी ८० हजार रुपये अनुदान द्यावे.
३. जनावरांच्या चारा व्यवस्थापनासाठी प्रतिपशू दरमहा ३ हजार रुपये मदत द्यावी.
४. शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून विद्यार्थ्यांना एसटी बसचा पास मोफत द्यावा.
५. शेतकऱ्यांच्या घरगुती वीज बिलात माफी द्यावी.
६. आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावीत.
७. एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर फेरपरीक्षा घेण्यात यावी.
८. विविध शासकीय कामे सुरू करून स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
९. पीक विम्याची रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना शेती अवजारे मोफत उपलब्ध करून द्यावीत.
१०. पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावी.

शेतकऱ्यांची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने, जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री उत्तमरावजी फड, जिल्हा संघटक शिवश्री राम रावणगावे, तालुका उपाध्यक्ष शिवश्री मनेश पाटील, ऑटो युनियनचे अध्यक्ष शिवश्री मोबीन सय्यद, तसेच शिवश्री उमाकांत कोठारे, शिवश्री सुलेमान, शिवश्री ज्ञानेश्वर भांगे, शिवश्री जी. पी. तरवडे, शिवश्री सुरेबा बिरादार, शिवश्री चंनाबस संभाळे, शिवश्री करण बिरादार यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

दौंडमध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संताप

Next Post

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा; गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा

Related Posts

ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

मालेगाव शहरात वारंवार वीज खंडित; नागरिक त्रस्त

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

तुळजापूर तालुक्यात बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांनी साजरा करा; सपोनि संतोष जोंधळे

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

धनगरवाडी येथे महापोषण अभियान उत्साहात संपन्न

September 10, 2026
1
Next Post

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा; गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा

ताज्या बातम्या

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In