शिरोळ प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला आहे बैलपोळा हा शेतकऱ्याचा आशीर्वाद मोठा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला खरापण शेतकऱ्यांत पाऊस नसल्याने शेतकऱ्याची चेहऱ्यावर आनंद दिसत नाही अनेक गावांमध्ये सोयाबीनचे पिके 70 ते 80 टक्के करून गेले आहे.
परिसरात सोयाबीनचे पाणी पिवळी पडून करपले आहेत जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती आता पिके गेलेले शेतकरी निराशा झाला आहे
शासनाने तात्काळ तलाठी मार्फत पंचनामा करून नुकसान भरपाई जाहीर करावी,पिक विमा कंपनीने तात्काळ सर्वे करून मदत द्यावी,दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्याला अनुदान द्यावे,प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावी अशी मागणी सर्व शेतकऱ्याकडून होत आहे.










